जळगाव : अखेर भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) उमेदवारी अर्ज मागे घेतला. अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं काल शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. यानंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत असून, भाजपावर टिका केली जात आहे.
[read_also content=”काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ९६ टक्के मतदान, १९ ऑक्टोबरला निकाल https://www.navarashtra.com/maharashtra/ninety-six-percent-polling-of-maharashtra-pradesh-congress-in-congress-president-election-337138.html”]
दरम्यान, आता महाविकास आघाडीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला आहे. भाजपाला पराभवाची भीती म्हणून अर्ज मागे घेतला, असा टोला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपाला लगावला आहे. समोर पराभव दिसत असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. असं खडसेंनी भाजपावर टिका केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या निर्णयानंतर लटके यांनी भाजपाचे तसेच शरद पवार व राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.