Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ब्राह्मण समाजाने ठरवलंय यापुढं महाविकास आघाडीसोबत राहायचं’

कसबा येथील (Kasba Peth Bypoll) विजय हा महाविकास आघाडीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे. भाजप ब्राह्मण समाजाला गृहीत धरते आणि त्यांच्यावर अन्याय करते, याच अन्यायाला कंटाळून ब्राह्मण समाजाने भाजपला चपराक लगावली. म्हणून आता ब्राह्मण समाजाने ठरवलंय की यापुढे महाविकास आघाडीसोबत राहायचं, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी (Manoj Kulkarni) यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 02, 2023 | 05:55 PM
‘ब्राह्मण समाजाने ठरवलंय यापुढं महाविकास आघाडीसोबत राहायचं’
Follow Us
Follow Us:

सोलापूर : कसबा येथील (Kasba Peth Bypoll) विजय हा महाविकास आघाडीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे. भाजप ब्राह्मण समाजाला गृहीत धरते आणि त्यांच्यावर अन्याय करते, याच अन्यायाला कंटाळून ब्राह्मण समाजाने भाजपला चपराक लगावली. म्हणून आता ब्राह्मण समाजाने ठरवलंय की यापुढे महाविकास आघाडीसोबत राहायचं, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी (Manoj Kulkarni) यांनी दिली.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. त्यानंतर मनोज कुलकर्णी यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ब्राह्मण समाज हा परंपरागत काँग्रेसचा मतदार आहे. ब्राह्मण समाजाचा भ्रमनिरास या भाजपने केला आहे. याचाच वचपा आजच्या कसबा निवडणुकीतून निघालेला आहे. ब्राह्मण समाजातील आश्वासन, भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ, अमृत महामंडळ ही दिलेली फक्त गाजरं आहेत. भारतीय जनता पक्षाने दिलेले हे गाजर याचाच भाग म्हणजे मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं. टिळक घराणं संपवण्याचं काम भाजपनं केलं, याचा राग कसबा निवडणुकीत दिसून आला.

दरम्यान, पुण्यातील मतदार, ब्राह्मण समाज यांनी अत्यंत चांगला निकाल दिला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘चिंचवडची सीट लागायला पाहिजे होती. परंतु, दुर्दैव गड आला पण सिंह गेला असेच म्हणावे लागेल’.

हेमंत रासनेंना 61,771 मतं

संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली. यामध्ये कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजय झाला तर हेमंत रासनेंना 61,771 मते मिळाली आहेत. धंगेकर यांना एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत.

Web Title: The brahmin community has decided to stay with the mahavikas aghadi says manoj kulkarni nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2023 | 05:55 PM

Topics:  

  • Balasaheb Dabhekar
  • Congress
  • Congress Politics
  • Hemant Rasane
  • Nana patole
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
3

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.