Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊस गाळप वाढणार, यंदा कसा असणार गळीत हंगाम? साखर आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती

पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या २०२५-२६ च्या हंगामात १५ साखर कारखान्यांकडून १ कोटी ६७ लाख १८ हजार मेट्रिक टन इतके ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती साखर आयुक्त संजय कोलते यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2025 | 04:02 PM
ऊस गाळप वाढणार, यंदा कसा असणार गळीत हंगाम? साखर आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती

ऊस गाळप वाढणार, यंदा कसा असणार गळीत हंगाम? साखर आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:
  • यंदा ऊस गाळप वाढणार
  • कसा असणार गळीत हंगाम?
  • साखर आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती
पुणे : पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या २०२५-२६ च्या हंगामात १५ साखर कारखान्यांकडून १ कोटी ६७ लाख १८ हजार मेट्रिक टन इतके ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती साखर आयुक्त संजय कोलते यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली. पुणे जिल्ह्यात गेल्यावर्षी २०२४-२५ मध्ये सुमारे १ कोटी १४ लाख ४६ हजार मेट्रिक टनाइतके ऊस गाळप कारखान्यांनी पूर्ण केले होते. याचा विचार करता गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे ५३ लाख मेट्रिक टनांनी ऊस गाळप वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यंदा १.६७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप अपेक्षित

पुणे जिल्ह्यात गतवर्षी बंद असलेला अनुराज शुगर्स हा खाजगी कारखाना यंदाचा ऊस गाळप हंगाम घेणार आहे. त्यामुळे चालू वर्षी ९ सहकारी व ६ खाजगी मिळून १५ साखर कारखाने सुरू राहतील आणि या कारखान्यांकडून ऊस गाळप परवान्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता सुमारे १ लाख ४ हजार ५०० मेट्रिक टनाइतकी आहे. याचा विचार करता १६० दिवस साखर कारखान्यांचा हंगाम सुरू राहू शकतो. म्हणजेच १५ एप्रिलपर्यंत कारखाने सुरू राहतील.

पावसामुळे ऊस तोडणीस होणार विलंब

राज्यात दिनांक १ नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झालेला आहे. मात्र, सध्या पावसाची हजेरी कायम असल्याने ऊस तोडणीस विलंब होण्याचीच दाट शक्यता आहे. कारण शेतामध्ये चिखल असल्याने कामगारांनाही ऊस तोडणी अडचणीची आहे. शिवाय ट्रॅक्टर व अन्य वाहनांद्वारे वाहतूक करणेही कठीण आहे. त्यामुळे पावसाची पूर्ण उघडीप झाल्याशिवाय ऊस तोडणीस गती येण्याची शक्यता सध्या दिसत नाही. शिवाय कारखान्यांना अद्याप साखर आयुक्तालयाकडून यंदाचा ऊस गाळप परवानाही वितरण होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The sugar commissioner has given detailed information about this years crushing season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Shugarcane

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
4

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.