
Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप
Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शहरातील नागरिकांच्या कालावधीत अनेक विकासकामे हाती अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशासक घेण्यात आली, काही पूर्ण झाली तर काही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. मात्र या कामांपैकी काही कामे दर्जाहीन झाल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आता खऱ्या अर्थाने ‘ऍक्शन मोड’मध्ये येण्याची गरज व्यक्त होत आहे.
प्रशासकीय कारभाराच्या काळात रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामांवर खर्च झाला. परंतु काही ठिकाणी कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वीच काही रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित कामांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन
विविध विभागांमध्ये सभापतींची नेमणूक करण्यात आली आहे. या सभापतींनी आप-आपल्या खात्यांतील कामांचा आढावा घेऊन त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. नगराध्यक्षांसह सर्व सभापतींनी शहरातील मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करून समस्यांचे तातडीने निराकरण अपेक्षित आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान नगराध्यक्ष व नगरसेवकानी नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. शहरातील पाणीटंचाई, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक स्वच्छता व सार्वजनिक सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या सर्व समस्यांचा अभ्यास करून ठोस कृती आराखडा जाहीर करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसहभाग महत्वाचा आहे. नगरपालिकेने नियमित आढावा बैठक घेऊन कामांचा दर्जा तपासावा, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी आणि नागरिकाना कामाची माहिती खुल्या पद्धतीने द्यावी, अशी अपेक्षा आहे. आता वेळ आश्वासनांची नाही, तर कृतीची आहे. असे श्रीवर्धनकराचे एकच म्हणणे आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी आणि विभागीय सभापतींनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या विकासासाठी ठोस व प्रभावी पावले उचलावीत. अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.