नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा (फोटो- युट्यूब)
नाशिक: नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच एवेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
नाशिकच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, ” मी हिंदुत्व सोडलेले नाही. हिंदू समाज हिंदू म्हणउण मतदान करू शकतो हे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. असे भुरसटलेले हिंदुत्व मला मान्य नाही. मी हिंदुत्व सोडलेले नाही. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही.” उद्धव ठाकरे यांनी इव्हीएम, वक्फ वरुण देखील टीका केली आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “वक्फ बिलाला आपण विरोध केला. त्याच्याशी हिंदूंचा काहीही संबंध नाही. भाजपने एकदा तरी त्यांचे हिंदुत्व काय आहे हे सांगावे. यांचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. ही केवळ समाजात भांडण लावून सत्ता कर आहेत. ही कोणाचेही नाहीत. वापर आणि फेका अशी यांची वृत्ती आहे. केवळ मतांसाठी हे सर्व सुरू आहे.
शिवसेनेने एक विक्रम केला. आता भाजप जे करत आहे ते नक्की काय आहे? भाजपने की आपण हिंदुत्व सोडले आहे? महाराष्ट्र हिंदुत्व जपणारा आहे. आम्ही जय श्रीराम म्हणतो. जय श्रीराम म्हणताना जय शिवराय देखील म्हटले पाहिजे. तुमची वेडीवाकडी संस्कृती आमच्यावर लादू देणार नाही.