Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Highway Road Condition: राष्ट्रीय महामार्ग 65 च्या खाली साचले पाण्याचे तळे; प्रवास धोक्याचा झाल्याने वाढले अपघाताचे प्रमाण

Latur Highway: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कारभारामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याची कुणीच दाद घेत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 28, 2025 | 06:52 PM
Umarga National Highway 65 Highway Road Bad Condition Latur Highway News

Umarga National Highway 65 Highway Road Bad Condition Latur Highway News

Follow Us
Close
Follow Us:

Highway Road Condition: उमरगा : शहरानजीक असलेल्या बाह्यवळण रस्तावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर असलेल्या बाह्यवळण रोडच्या रस्त्याखाली असलेल्या पुलाखाली पाणी थांबल्याने प्रवाशांना धोका पत्करून मार्ग काढावा लागत आहे. कोरेगाव, गुगळगाव, बागदरी, माडज नाईचाकूर आदी गावांना जाण्यासाठी करण्यात आलेल्या भुयारी मागांत गेली अनेक दिवसांपासून पाणी थांबले आहे. य परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना दररोज शेतीच्या कामासाठी जा-ये करण्यासाठी याच ठिकाणाहून जावे लागते. मात्र या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने अनेक अपघात झाले आहेत. पाण्यातून जाण्यासाठी अनेकजण दुचाकी चालवत पाण्यातून जाण्याच्या प्रयत्न करतात. मात्र पाण्यात असलेल्या खङ्गधाचा अंदाज येत नसल्याने अनेजण पडून जखमी झालले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कारभारामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याची कुणीच दाद घेत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.

पुलाची उंची कमी असल्याने जड़वाहन चालकांची अडचणः सोशल मीडियावर विभागाची थट्टा

उमरगा शहरालगत गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण बायपास रोड करण्यात आला. महामार्गावर धावणारी अवजड वाहने शहरातून जात असताना वाहतूककोंडी होऊ नये, नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये आणि शहरातील व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून शहरापासून जवळच रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावर असलेल्या कोरेगावकडे जाण्यासाठी अंडर ग्राऊंड पूल बनविण्यात आला. मात्र पुलाची उंची कमी असल्याने अनेक वाहनधारकांना आपली अवजड वाहने घेऊन जाणे अवघड झाले आहे. केवळ लहान गाड्यांची सुरक्षित ये-जा होऊ शकते. मात्र मालवाहू गाड्या या पुलाखालून जाऊ शकत नाहीत. उसाने भरलेला ट्रक जाऊ शकत नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा उत्तम नमुना म्हणून सोशल मीडियावर याची थट्टा केली जात असतानाही महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना इकडे पाहण्यासाठी सवड मिळत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बायपास रोडवरील भुयारी मार्गात दोन फूट पाणी थांबले असून दररोज आठ-दहा दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. शिवाय पर्यायी मार्गाने जाणे जिकिरीचे झाले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या ठिकाणाहून भरधाव गाड्या धावत असतात. त्यामुळे हा भुयारी मार्ग असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. बाह्यवळण रस्त्यावर अनेक सुविधा नसल्याने अपघात वाढत असल्याने शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी हा रस्ता रोखून धरला होता. यावेळी आ. प्रवीण स्वामी यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून आंदोलनात सहभागी होत महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र ती धार आता बोथट झाली आहे. पुन्हा अपघातसत्र चालू झाल्याने याला कोणीही वाली नसल्याची चर्चा नागरिकांतून ऐकायला मिळत आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिशादर्शक फलकांचा नाही पत्ता

तालुक्यातील अनेक गावातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गवर अनेक ठिकाणी वळण आहे. मात्र तिथे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. कॉर्नरजवळ पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या पटचा मारल्या नाहीत, वाहनचालकांना देण्यात येणारा अणि इशारा फलकाचे फ्लेक्स लावले नसल्याने अनेक अपघात होत आहेत.

दिवाळीत अपघातामध्ये तरुणांचा गेला बळी

ऐन दिवाळीच्या सणात दाळिंब गावाजवळ दोन कारचा अपघात होऊन यात चार तरुण जागीच ठार झाले. निष्पाप जीव गमवावे लागले, याला जबाबदार कोण? महामार्गावर दिशादर्शक फलक लावले नसल्याने वळण रस्त्याचा अंदाज वाहनचालकाला आला नसल्याने हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. प्राधिकरणाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करण्याचा बडगा उगारतात. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या ही अवस्था कायमच आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Umarga national highway 65 highway road bad condition latur highway news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • highway news
  • Latur news
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

राज्यातील पर्यटकांना हत्तीबेटाचा भरळ; One Day Trip साठी जाणून घ्या कुठे आहे अन् कसे जाल?
1

राज्यातील पर्यटकांना हत्तीबेटाचा भरळ; One Day Trip साठी जाणून घ्या कुठे आहे अन् कसे जाल?

1 खुर्ची, 2 महिला अधिकारी…! गडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर ओतलं पाणी; Video Viral
2

1 खुर्ची, 2 महिला अधिकारी…! गडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर ओतलं पाणी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.