Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरोधी नेत्यांकडून टीकांचा भडीमार; मोदी सरकारच्या बजेटवर ‘हे’ नेते नाराज

केंद्र सरकारकडून देशाचे पूर्ण बजेट सादर करण्यात आले. निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. मात्र विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 23, 2024 | 06:46 PM
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : केंद्रामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे पूर्ण बजेट सादर केले. यावेळी विविध घोषणांसह क्षेत्रांसाठी तरतूदी देण्यात आल्या. शेतकरी, महिला व नोकदार वर्गासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर हे पहिलेच बजेट असल्यामुळे अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. मात्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या बजेटवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील अनेक नेते व खासदारांनी नाराजीचा सूर लावला आहे.

बजेट सरकार वाचवण्याकरिता

कॉंग्रेस प्रवक्ता असलेले अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकार वाचवण्यासाठी हा अर्थसंकल्प असल्याची टीका केली. अतुल लोंढे म्हणाले, “आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाचा नसून दोन राज्यांचा होता. ग्रामीण अर्थव्यवस्थेतेसाठी काही ठोस उपाय योजना नाहीत , मनरेगा मधून रोजगार मिळू शकतो. सादर केलेल्या अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काही नाही. यात आर्थिक विषमता कमी करण्यासारखं काही नाहीये. जे मध्यमवर्गीय भाजपला मतदान करतात, त्याच्यासाठी काही नव्हतं. महागाई कमी होण्यासारखं काय नाही, हे बजेट सरकार वाचवण्याकरिता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दावा केला होता महाराष्ट्राच्या विकासासाठी ते मोदीं सोबत गेले. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्याचं उत्तर मिळेल,” अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.

राज्याच्या योजना या कॉपी केलेल्या

शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील मोदी सरकारच्या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हे देशाचं बजेट आहे. भारत सरकार म्हणजे प्रत्येक राज्याचा मोठा भाऊ आहे. फक्त महाराष्ट्र नाही इतर राज्यांना पण काहीही मिळालेलं नाही. बंगाल आणि झारखंडला काय मिळालं. आपला लाडका बिहार आणि आपला लाडका आंध्रप्रदेश इतकंच या अर्थसंकल्पात होतं. महाराष्ट्र आणि इतर राज्य परके आहेत का? काहीही टॅक्स रिफॉर्म नाही. फक्त फॉरेन कंपनीचा टँक्स 30 वरुन 25 वर आला आहे. नवीन काहीही नाही या बजेटमध्ये. अर्थमंत्री म्हणाल्या की, आम्ही शेतकऱ्यांचं 50 टक्के उत्पन्न वाढवणार. त्यांनी 10 वर्षात दुप्पट करणार असल्याचं म्हटलं होतं. दुसरं मला खटकलं ते लँड रिफॉर्म. जमीन हा राज्याचा विषय आहे. आम्ही सगळे लँड रिफॉर्म हे डिजीटलायजेशन करु असं त्यांनी म्हटलं. पण हा राज्याचा विषय आहे यात केंद्र का हस्तक्षेप करतंय. राज्याच्या योजना या कॉपी करुन घेतल्या आहेत. काँग्रेसचीच योजना कॉपी पेस्ट केली आहे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मिंधे सरकारकडून महाराष्ट्राची लूट

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्पावर रोष व्यक्त केला. आदित्य ठाकरे म्हणाले, “सरकार वाचवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारला निधी दिला जातोय, हे मी समजू शकतो. पण महाराष्ट्राचा नेमका दोष काय. महाराष्ट्र राज्य केंद्राला सर्वाधिक कर देतो. हाच महाराष्ट्राचा दोष आहे का. आम्ही राज्याला सर्वाधिक कर देतो पण अर्थसंकल्पात मात्र राज्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा एकदातरी उल्लेख केला का? भाजपा महाराष्ट्राचा एवढा तिरस्कार का करते? भाजपा महाराष्ट्राचा एवढा अपमान का करते? महाराष्ट्रासोबत केला जात असलेला दुजाभाव ही पहिलीच वेळ नाही. गेल्या दशकभरात महाराष्ट्रासोबत असे होत आहे. सध्या राज्यात असंवैधानिक सरकार असून सर्वाधिक भ्रष्ट सरकारतर्फे सध्या राज्यकारभार हाकला जातोय. असे असूनही सध्या राज्याला केंद्र सरकारकडून काहीही मिळत नाहीये. राज्यात मिंधे सरकारकडून महाराष्ट्राची लूट केली जात आहे,” असा घणाघाती आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Web Title: Various leaders of mahavikas aghadi criticized the budget presented by nirmala sitharaman of modi goverment nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 06:45 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Atul Londhe
  • Mahavikas Aghadi
  • Nirmala Sitharaman
  • supriya sule
  • Union Budget 2024

संबंधित बातम्या

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक
1

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.