Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा; 1 एप्रिलला होणार जनसुनावणी

ऊस बिलांच्या देयका संदर्भात होणारी दिरंगाई वजनातील तफावत बेकायदेशीर कपात या विरोधात सातारा जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 12:32 PM
ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसचे जनसुनावणी अभियानाचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे जन सुनावणी अभियान एक एप्रिल रोजी सकाळी दहा ते तीन यादरम्यान येथील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये होणार आहे.

याबाबतची माहिती सातारा जिल्हा काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्ष सुषमा राजे घोरपडे व सातारा जिल्हा किसान काँग्रेस कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जन सुनावणी आंदोलनाबाबत बोलताना वसीम इनामदार पुढे म्हणाले, ‘ऊस बिलांच्या देयका संदर्भात होणारी दिरंगाई वजनातील तफावत बेकायदेशीर कपात या विरोधात सातारा जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा काँग्रेसने विशेष जन सुनावणी अभियान घेतले आहे. ज्या शेतकऱ्यांना ऊस बिला संदर्भातील अडचणी येत आहेत, त्यांनी काँग्रेस भवन कार्यालयात येऊन आपल्या तक्रारी या अभियानामध्ये नोंदवायच्या आहेत.

सुषमा राजे घोरपडे पुढे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यातील बळीराजा पर्जन्यमान अवकाळी पाऊस कधी दुष्काळ यामुळे आधीच अडचणीत असताना त्याला साखर कारखानदारांकडून जास्त अडचणीत आणले जात आहे, अशा शेतकऱ्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. कामाचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी प्रतीक्षा अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष व पक्षाचे सर्व सेल शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला घाबरू नये

शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला न घाबरता या जन सुनावणी अभियानामध्ये भाग घेऊन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात ऊस बिलाची दिरंगाई वजनातील फरक तसेच बिलामध्ये केली जाणारी बेकादेशीर कपात या विरोधात जन आंदोलन उभे केले जाणार आहे, असा इशारा सुषमा राजे घोरपडे यांनी दिला. यावेळी सादिक बागवान लक्ष्मण मोरे अवधूत निकम उपस्थित होते.

हेदेखील वाचा : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला काढणार ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

Web Title: Warning of agitation against sugar factories defaulting on sugarcane payments public hearing scheduled for april 1st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Congress Politics
  • Maharashtra Politics
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?
1

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?

Satara News : रस्त्यांची दुरावस्था ठरतेय मृत्यूचं कारण; धुळदेव गावच्या हद्दीत Alto कारचा अपघात
2

Satara News : रस्त्यांची दुरावस्था ठरतेय मृत्यूचं कारण; धुळदेव गावच्या हद्दीत Alto कारचा अपघात

ADR India Report: निवडणूक रोखे रद्द झाले तरी भाजपच्या तिजोरीत कोट्यवधींचं घबाड; २०२४-२५ आर्थिक वर्षांचा आकडा पाहून बसेल धक्का
3

ADR India Report: निवडणूक रोखे रद्द झाले तरी भाजपच्या तिजोरीत कोट्यवधींचं घबाड; २०२४-२५ आर्थिक वर्षांचा आकडा पाहून बसेल धक्का

Sanjay Raut News: खरात बाबाच्या पायाचे तीर्थ प्यायला जाणारे ते ४० आमदार कोण? संजय राऊतांचा खोचक सवाल
4

Sanjay Raut News: खरात बाबाच्या पायाचे तीर्थ प्यायला जाणारे ते ४० आमदार कोण? संजय राऊतांचा खोचक सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.