Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात पुढचे दोन दिवस उन्हाचा जबरदस्त तडाका-‘या’ वेळेत घराबाहेर पडू नका, उष्णतेच्या लाटेमुळे हवामान विभागाचं आवाहन

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 अंशांच्या आसपास जाणार आहे.राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

  • By साधना
Updated On: Feb 20, 2023 | 04:13 PM
heat wave

heat wave

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात पुढील दोन दिवस तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने (Weather Forecast) केले आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे. तसेच आवश्यक असेल तर पाण्याची बाटली घेऊन घराबाहेर पडावे, असे पुणे हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.

कोकण पट्ट्यात वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट का येण्याची शक्यता आहे?
याचे कारण म्हणजे जमिनीच्या पातळीजवळचे वारे जे उत्तरेकडून येत आहेत जे आधीच उष्ण आहेत pic.twitter.com/BAmStzDUmr

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 20, 2023

कोकणासाठी यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 अंशांच्या आसपास जाणार आहे. कोकणामध्ये विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासाठी आज यलो अलर्टचा (Yellow Alert In Kokan) इशारा देण्यात आला आहे. राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

#Heatwave alerts by IMD Mumbai @RMC_Mumbai for #Maharashtra, #Konkan area for 48 hrs.
Though Yellow Alerts, but still TC pl.
Avoid outside between 11-2pm if possible. Water bottle necessary.
????????????☂ pic.twitter.com/AQUpIZLSYz

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 20, 2023

रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी तापमान 37.9 अंश असे नोंदवले गेले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानाचा पाराही 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान आणि कमाल तापमान यात मोठी तफावत आहे. त्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके, अशी स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासोबत गोव्यामध्येही कमाल तापमानाचा पारा 37 ते 39 अंशांदरम्यान आहे. तीन दिवसांनंतर कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची घट जाणवू शकेल. दरम्यान, हवामान विभागाने कच्छमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सर्वसाधारणपणे उत्तर महाराष्ट्रात याचा परिणाम दिसून येतो. मात्र, हवामान विभागाने राज्यातील इतर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला नाही.

Web Title: Weather forecast report heat wave in maharashtra for next two days nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 04:03 PM

Topics:  

  • heat wave
  • Heat Wave in Maharashtra
  • maharashtra weather alert
  • maharashtra weather update
  • Marathi News
  • weather news

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
1

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
2

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
3

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.