नवी मुंबई : रविवारी म्हणजे काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis) हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्रीसेवकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. तसेच यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#WATCH| Navi Mumbai: Uddhav Thackeray, Aditya Thackeray & NCP leader Ajit Pawar interact with Doctor in MGM Kamothe Hospital, take stock of the situation
11 people died & more than 20 are undergoing treatment after they suffered heatstroke during Maharashtra Bhushan Award… pic.twitter.com/0nNGvGlFXW
— ANI (@ANI) April 16, 2023
कोण कुणाची चौकशी करणार?
रविवारी मविआ नेत्यांनी रात्री उशिरा नागपूरमधील वज्रमूठ सभा संपल्यानंतर उष्माघातामुळं आजारी पडलेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दुर्घटनची चौकशी होणार का? अमित शहांना सांयकाळी गोव्याला जायचे होते, म्हणून हा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला, त्यामुळं उष्माघातामुळं अकरा जणांचे बळी गेले. त्यामुळं या दुर्घटनेची चौकशी होणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता, “जर अमित शहांना संध्याकाळी गोव्याला जायचे होते, म्हणून हा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला असेल, तर कोण कोणाची चौकशी करणार?, अमित शहांची चौकशी कोण करणार”, असा टोला उद्धव ठाकरेंनी अमित शहांना लगावला.
रुग्णांची मविआ नेत्यांनी घेतली भेट…
दरम्यान, मविआ नेत्यांनी रात्री उशिरा नागपूरमधील वज्रमूठ सभा संपल्यानंतर उष्माघातामुळं आजारी पडलेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन विचारपूस करत, त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई येथे भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच खारघर येथील पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांनाही दोघांनी श्रध्दांजली वाहिली असून, त्यांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे. भरदुपारी झालेल्या या कार्यक्रमाला 20 लाख श्री सेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रम दुपारी एकच्या सुमारास संपला, त्यानंतर भर उन्हात इतका वेळ बसलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला.