
Akhari sawal
चित्रपटाचा प्रवास सतत सार्वजनिक आणि राजकीय चर्चांमध्ये राहिला आहे। दिल्लीमध्ये चित्रपटाचा भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता देखील उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चित्रपटाचे कौतुक केले। रिपोर्ट्सनुसार, आखिरी सवालची स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनातही अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
हा चित्रपट UAE मध्येही बॅन करण्यात आला होता, कारण तेथील सेन्सॉर बोर्डाने थिएटर रिलीजसाठी अनेक कट्स आणि बदल सुचवले होते. मात्र, निर्मात्यांनी या मागण्या अनुचित असल्याचे सांगत चित्रपटाच्या ओरिजिनल व्हर्जनसोबत ठाम राहण्याचा निर्णय घेतला आणि कोणतेही बदल करण्यास नकार दिला. चित्रपटाच्या कंटेंटविरोधात PIL देखील दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडींनंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता कायम आहे.
संजय दत्त, अमित साध, समीरा रेड्डी, त्रिधा चौधरी, नीतू चंद्रा आणि नमाशी चक्रवर्ती अभिनित आखिरी सवाल आपल्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक कथनशैलीमुळे प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे.आखिरी सवालचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. चित्रपटाचे सादरीकरण निखिल नंदा यांनी केले असून, निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली आहे. चित्रपटाचे सह-निर्माते पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद आहेत. कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट 15 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.