(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आकांक्षा म्हणाली, “जेव्हा आमचं लग्न झालं होतं, तेव्हा मला कधीच मातृत्वाची भावना जाणवली नाही. पण मी ती भावना अनुभवण्यासाठी नेहमीच तयार होते आणि मी ती कधीच दाबून ठेवली नाही. हळूहळू माझ्या लक्षात आले की मी या कामासाठी बनलेली नाही, आणि त्यालाही त्याची पर्वा नव्हती. पण मला वाटतं की काळानुसार हा विचार बदलला.”
ती पुढे म्हणाली, “आता त्याला मुलं हवी आहेत, आणि मी त्याला ते देऊ शकत नाही. माझ्यात आई होण्याची क्षमता नव्हती, हे मी त्याला खूप पूर्वीच सांगितलं होतं. जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे माझ्या नशिबात नाही, तेव्हा मी त्याला सांगितलं की मी हे करणार नाही. त्यामुळे आमची चर्चा झाली, ज्यात मी त्याला म्हणाले, ‘जर तुला मला सोडायचं असेल, तर सोडून दे.’ खरं सांगायचं तर, लोक याच कारणासाठी लग्न करतात… ९९% लोक लग्न करतात कारण त्यांना मुलं आणि कुटुंब हवं असतं, पुढे जायचं असतं, नाहीतर ते लग्न का करतील?”
आकांक्षाला मूल दत्तक घ्यायचंही नाही
आकांक्षा पुढे म्हणाली की तिला मूल दत्तक घ्यायचंही नाही कारण तिला मुलांशिवाय आपलं आयुष्य जगायचं आहे. गौरवने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो सध्या ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये सहभागी आहे.
Shah Rukh Khan help: शाहरुख खानच्या एका सहीची कमाल! बँकेने ‘या’ मराठी अभिनेत्याचं होम लोन केलं मंजूर
आकांक्षा चमोला ‘संतोषी माँ’, ‘ये है आशिकी’ आणि ‘क्राईम पेट्रोल’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. काही काळ डेटिंग केल्यानंतर, तिने आणि गौरव खन्नाने २०१६ मध्ये लग्न केले. असे म्हटले जाते की, ते एका ऑडिशनदरम्यान भेटले आणि प्रेमात पडले. गौरव आणि आकांक्षाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी गौरवच्या मूळ गावी कानपूर येथे एका भव्य तीन दिवसीय विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
बिग बॉस दरम्यान, जेव्हा गौरववर त्याच्या पत्नीच्या मूल न होण्याच्या निर्णयाबद्दल बोलून ‘ सहानुभूती मिळवण्याचा डाव’ खेळल्याचा आरोप झाला, तेव्हा तो भावूक झाला. ही घटना गेल्या वर्षी फिनाले वीकच्या पहिल्या दिवशी घडली, जेव्हा फायनलिस्टना माध्यमांच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले.






