
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आजच्या डिजिटल युगात प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचे असंख्य पर्याय उपलब्ध असले तरी, ‘Wheel of Fortune’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा कुटुंबियांसोबत ठराविक वेळी बसून पाहण्याची परंपरा जिवंत करत आहे. हा केवळ गेम शो नसून, सामूहिक अनुभव देणारा विशेष मनोरंजन सोहळा ठरत आहे.
नॉस्टॅल्जियाची जोड, नामांकित सेलिब्रिटींची उपस्थिती, उत्स्फूर्त संवाद आणि अनपेक्षित घडामोडी यामुळे हा शो ओळखीचा पण नव्या उत्साहाने भरलेला असा फॉरमॅट प्रेक्षकांसमोर सादर करतो. ‘Shark Tank India’ विशेष भागात अमन गुप्ता, अनुपम मित्तल आणि नमिता थापर यांसारखी मान्यवर मंडळी सुपर होस्ट अक्षय कुमार यांच्यासोबत मंचावर उपस्थित राहणार आहेत. याच भागात एक अत्यंत चर्चेचा क्षण प्रेक्षकांच्या समोर आला. रॅपिड-फायर फेरीत अमन गुप्ता यांनी अक्षय कुमार यांना विचारले, “तुमचा सर्वात ‘गजब बेइज्जती’ क्षण कोणता?”
या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमार याने हलक्याफुलक्या शैलीऐवजी प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगितली. एका समारंभात ते आपल्या जिवलग मित्रासोबत उपस्थित होते. काही कारणास्तव वाद निर्माण झाला आणि एका व्यक्तीने त्यांच्या मित्राविषयी वारंवार अपमानास्पद भाषा वापरण्यास सुरुवात केली. “त्याने एकदा अपशब्द वापरला, मी त्याला थांबवले. पुन्हा तसेच झाले. तिसऱ्यांदा देखील तसेच झाले. मी चार-पाच वेळा इशारा दिला, तरीही तो थांबला नाही,” असे अक्षय कुमार यांनी सांगितले. संतापाच्या भरात त्यांनी त्या व्यक्तीला झापड मारली, आणि तो व्यक्ती काही काळासाठी बेशुद्ध पडला.
“तो अत्यंत मोठा समारंभ होता. माझा मित्र अपमानित झाल्याने भावनिक झाला होता,” असे त्याने नमूद केले. घटनेनंतर काही क्षण तणावपूर्ण झाले. “आम्ही त्याच्यावर पाणी टाकले आणि तो शुद्धीवर यावा यासाठी मी मनोमन प्रार्थना करत होतो,” असे त्यांनी आठवले. सुदैवाने काही क्षणांतच त्या व्यक्तीला शुद्ध आली. आज अक्षय कुमार यांनी स्पष्ट केले की ही चूक होती आणि आज अशी परिस्थिती उद्भवली असती, तर त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता. “तोच खरा ‘गजब बेइज्जती’ क्षण होता. जो बदलण्याची संधी मिळाली असती तर मी नक्की बदलला असतो. आज मी शांतपणे त्या ठिकाणाहून निघून गेलो असतो,” असे ते म्हणाले. हलक्या-फुलक्या वातावरणात सुरू झालेल्या संवादाने अनपेक्षितपणे गंभीर आणि