
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री ऋचा चड्ढाला जागतिक स्तरावर गाजलेल्या ‘हीरामंडी’ मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी मोठं कौतुक मिळालं. तिने एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मोकळेपणाने शेअर केला आणि त्यांना एक कथाकार म्हणून खास काय बनवतात हे सांगितले. तसेच अभिनेत्रीने त्यांचे कौतुक देखील केले.
कारवर पोलिसांचे स्टिकर लावल्यामुळे रोहित शेट्टी अडचणीत; नेमकं प्रकरण काय?
भन्साळी यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या क्रिएटिव्ह व्हिजनबद्दल बोलताना ऋचा म्हणाली की, संजय सरांसाठी ‘संजय लीला भन्साळी’ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्या आईचा खूप आदर करतात आणि जे काही करतात त्यात तिचं नाव अभिमानाने जोडतात. त्यांचं संगोपन त्यांच्या बहिणी बेलासोबत झालं आहे. त्यामुळे प्रेमळ महिलांच्या सहवासात वाढणं आणि महिलांविषयी आदर बाळगणं, ही त्यांच्या विचारसरणीची एक महत्त्वाची बाजू आहे. ऋचाच्या मते, महिलांविषयीचा हा खोल आदर त्यांच्या सिनेमातही स्पष्टपणे दिसून येतो, जो अनेक वर्षांपासून भन्साळी यांच्या चित्रपटांची ओळख बनला आहे.
अभिनेत्री त्यांच्याबद्दल सांगताना पुढे म्हणाली की, ‘हे त्यांच्या कामातही जाणवतं. उदाहरणार्थ, देवदासमध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पारो आणि चंद्रमुखी ही पात्रं पितृसत्ताक चौकटीत अडकलेली असली तरी ती केवळ सहाय्यक नसून कथा पुढे नेणारी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे गंगूबाई काठियावाडी आणि ‘हीरामंडी’सारख्या कथांमध्ये महिलाच कथानकाच्या केंद्रस्थानी असून नेतृत्व करताना दिसतात.
भन्साळी यांची खासियत म्हणजे ते स्त्रियांची भावनिकदृष्ट्या समृद्ध, गुंतागुंतीची आणि प्रभावी पात्रं घडवतात. त्या दडपशाहीत असोत किंवा बंडखोरीचं नेतृत्व करत असोत, त्यांच्या कथा नेहमीच स्त्रीशक्तीला अधोरेखित करतात. ‘देवदास’मधील पारो आणि चंद्रमुखीपासून ते बेधडक आणि मजबूत गंगूबाईपर्यंत, त्यांच्या महिला व्यक्तिरेखा कधीही फक्त सजावटीपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या कथेला दिशा देणारी शक्ती ठरतात.