
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एकेकाळी बॉलिवूडमध्ये ‘हिरो नंबर १’ म्हणून प्रसिद्ध असलेला Govinda प्रचंड लोकप्रिय होता. त्याच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागत असत आणि तो एकाच वेळी अनेक सिनेमांचे शूटिंग करत असे. पण आता परिस्थिती बदलली आहे. सध्या त्याच्याकडे मोठे चित्रपट किंवा गाजलेले प्रोजेक्ट नाहीत.अभिनेता हा अनेकदा सेटवर, तसेच काही कार्यक्रमांना उशिरा येत असल्याचं त्याच्या सहकलाकारांनी सांगितले आहे. प्रल्हाद कक्कर, दिग्दर्शक अनीस बज्मी आणि निर्माते वाशू भगनानी यांनीही याबाबत काही घटना सांगितल्या आहेत. नुकताच अबू मलिक यांनीही गोविंदाच्या उशिरा येण्याचा एक प्रसंग सांगितला आहे.
आता, संगीतकार आणि शोचे आयोजक अबू मलिक यांनी एका नवीन मुलाखतीत गोविंदाबद्दल खुलासे केले आहेत. त्यांनी खुलासा केला आहे की,” गोविंदाने एकदा त्याच्या मेहुण्याने आयोजित केलेल्या लाईव्ह कार्यक्रमाला वगळले होते, जरी गोविंदाने स्वतः त्याला महाराष्ट्रातील पुसुद गावात सादरीकरण करण्यास सांगितले होते. हा कार्यक्रम गोविंदाचा मेहुणा, निर्माते आत्माप्रकाश शर्मा यांनी आयोजित केला होता, जो त्याची बहीण पद्मा शर्माचा पती आहे. हजारो चाहते कार्यक्रमात अभिनेत्याची वाट पाहत होते, परंतु गोविंदा हजर राहिला नाही. त्याला घरी आणण्यासाठी हेलिकॉप्टर देखील पाठवण्यात आले होते, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.”
अबू म्हणाले, “तोपर्यंत गोविंदा एक मोठा स्टार झाला होता. त्याने मला त्याच्यासाठी एक शो करायला सांगितले जेणेकरून तो काही पैसे वाचवू शकेल. हा शो महाराष्ट्रातील एका गावात आयोजित करण्यात आला होता. मी होकार दिला कारण गोविंदा आधीच माझ्यासाठी एक चित्रपट करत होता. मी गोविंदासाठी तो मोफत करायला तयार होतो. कार्यक्रमस्थळ भरले होते आणि हजारो लोक गोविंदाला पाहण्यासाठी आले होते, पण तो आला नाही.”
यावेळी अबू मलिक यांचे धाकटे भाऊ, आणि संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक यांनी तेव्हा तो प्रसंग सावरून घेतला. या कठीण परिस्थितीतून बाहेर काढले कारण तो गोविंदासारखाच दिसत होता.”
अबू म्हणाले, लोक गोविंदाबद्दल विचारपूस करत होते.मी सांगत होतो की, तो लवकरच येईल, पण तो काही आलाच नाही.
ऑर्केस्ट्रा सुरू झाला. संगीत सुरू झाले. सगळे गोविंदाची विचारपूस करत होते. मी सर्वांना सांगत राहिलो की गोविंदा येत आहे. पण तो आला नाही. मला वाटले होते की १५,००० लोक मला मारतील. गोविंदाला आणण्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे असे मला सांगण्यात आले. पण नंतर मला कळले की हेलिकॉप्टर कुठे उतरेल?”
५१ वर्षांच्या कारकिर्दीनंतर रजनीकांत निवृत्त होणार? शेवटच्या चित्रपटावर काम सुरू
”मला काय करावं सुचत नव्हते. शेवटी मी माझ्या भावाला गोविंदाच्या गाण्यांवर डान्स करायला सांगितले. कारण तो थोडा थोडा त्याच्यासारखाच दिसत होता. गाणे सादर केले आणि कार्यक्रम संपताच आम्ही लगेच बसमध्ये बसून निघून गेलो.”
Tara : युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता!