
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सलमान खानचा बिग बॉस सीझन १९ हा शोचा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. यंदा या शोमध्ये अभिनेता गौरव खन्नाने आपल्या नावावर ट्रॉफी केली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा प्रणित मोरे, अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल यांची गौरव सोबत टक्कर झाली. यावेळी प्रणित मोरेला सुद्धा प्रेक्षकांचा दणदणीत पाठिंबा मिळालेला. तो जिंकेल अशी सर्वांना आशा होती पण त्याला टॉप 3 मध्ये समाधान मानावे लागले. या निकालामुळे प्रणितचे चाहते नाराज झाले. पण तरीही त्याने शो संपल्यावर दिलेल्या मुलाखतीमध्ये समाधान देखील व्यक्त केले आणि सगळ्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले.
Dhurandhar Collection: ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर केला कल्ला; तीन दिवसांत मोडले ७ चित्रपटांचे रेकॉर्डस्
प्रणित मोरेने फ्री प्रेस जनरलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मला खरंच खूप छान वाटतंय. जेव्हा मी या घरात यायचं ठरवलं तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी बिग बॉस मध्ये इतके महिने काढीन. मला माझ्या फॅन्सचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांना माझा अभिमान वाटतोय हे पाहूनच मला खूप भारी वाटतंय.’
पुढे तो म्हणाला, खरे तर जेव्हा मी टॉप ५ मध्ये पोहोचलो तेव्हाच ठरवलेलं की आता जिंकण्यासाठी मनापासून प्रयत्न करायचा. गौरव खन्ना आणि मी बोलायचो की आपल्यालाच घराचे लाईट्स बंद करून बाहेर पडायचं आहे. आम्हा दोघांनाही टॉप २ मध्ये जायची इच्छा होती. पण मी टॉप ३ बनवून बाहेर आलो तेव्हा मला थोडा वाईट वाटलं. पण त्याच्या पुढच्याच क्षणी मी ते स्वीकारलं की ठीक आहे आपला प्रवास इथपर्यंतच होता. मला ज्यांनी पाठिंबा दिला, मत दिली त्या सर्वांचे आभार. मी बाहेर पडल्यानंतर माझी एकच इच्छा होती की गौरवने हा शो जिंकावा. माझ्यासाठी गौरव भाऊने हा शो जिंकणं हे मी जिंकण्या समानच आहे. त्यामुळे विजेता म्हणून जेव्हा त्याचं नाव घोषित झालं तेव्हा मी खूप खुश झालो होतो.’
तसेच सोशल मीडियावर गौरव हा शो चा विजेता बनू शकत नाही असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तुला काय वाटतं असं प्रणित मोरेला विचारले असता तो म्हणाला की, प्रत्येक स्पर्धकाच्या चाहत्याला असं वाटतं की आपल्या आवडत्या स्पर्धकांनीच शो जिंकला पाहिजे. हे अगदी क्रिकेटसारखा आहे. मला नेहमी वाटतं की आपली टीम इंडिया जिंकली पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की दुसरं कोणी जिंकू नये किंवा ते लोक जिंकण्यासाठी पात्र नाहीत. गौरवणे संपूर्ण शो मध्ये उत्तम कामगिरी केली त्यामुळेच त्याच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत पाठिंबा दिला. तो नेहमी स्वतःसाठी आणि त्याला पटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी स्टॅन्ड घेत राहिला. तो खूप समजूतदार आहे. जे लोक इतरांना प्रेरणा देतात, सर्वांसमोर चांगला आदर्श ठेवतात ते जिंकलेच पाहिजे तसं मला कायम वाटतं.’ असे प्रणित बोलताना दिसला आहे.