कोकण म्हणजे निसर्गाने नटलेले सदाबहार! या निसर्गाला पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे आतुरलेले असतात. तुम्हीही यंदा कुठे तरी बाहेर जाण्याचे आणि मज्जा मस्ती करण्याचे प्लॅन बनवत आहात तर नक्कीच कोकण हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण तो मुंबईपासून तसा काही फार अंतरावर नाही.
उन्हाळ्यात कोकणात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण! (फोटो सौजन्य - Social Media)

मुंबई तसेच पुणेकरांसाठी, सगळ्यात जवळचे पर्यटन ठिकाण म्हणजे कोकण! आणि या कोकणात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत... नक्की कोणते? जाणून घ्या.

अरबी समुद्राच्या किनारी वसलेले रत्नागिरी हे बंदर आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर आहे. येथील समुद्रकिनारे, दीपगृह आणि सह्याद्रीच्या रांगांनी नटलेले सौंदर्य पर्यटकांना साद घालते. कोकणचा सुप्रसिद्ध हापूस आंबा याच भागात पिकतो, त्यामुळे उन्हाळ्यात येथे आंब्याची मजा लुटता येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील समुद्राचे स्वच्छ पाणी आणि पांढरी वाळू हे वैशिष्ट्य पर्यटकांना आकर्षित करते. जलक्रीडा आणि स्कुबा डायव्हिंगसाठी हे उत्तम डेस्टिनेशन आहे.

सह्याद्रीच्या रांगा, अरबी समुद्र आणि ऐतिहासिक किल्ल्यांनी समृद्ध सिंधुदुर्ग हा निसर्ग आणि इतिहास प्रेमींसाठी परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे. येथे किल्ल्यांसह मांगेली, नापणे आणि शिवपूर यांसारखे धबधबे देखील आहेत.

रत्नागिरीपासून अवघ्या २५ किमी अंतरावर वसलेले गणपतीपुळे हे शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे गणपतीच्या आकाराची टेकडी आणि समुद्रकिनाऱ्याचा अनोखा संगम पाहायला मिळतो.






