पावसाळ्यात विकतचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते आणि पोटात कायमच जडपणा जाणवू लागतो. पोटात वाढलेल्या जडपणामुळे कोणतेही पदार्थ खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्याऐवजी अन्ननलिकेमध्ये पुन्हा एकदा परत येतात. त्यामुळे पावसाळ्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून पोट फुगल्यासारखे वाटल्यास कोणते उपाय करावेत. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात कायमच पोटात जडपणा जाणवतो? मग नियमित करा 'या' काढ्याचे सेवन, आतड्यांमधील गॅस पडून जाईल बाहेर

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जठराग्नी मंदावलेला असतो, ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ लवकर पचन होत नाहीत. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते.

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर पचनास जड असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. अतिशय हलका आणि शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

कडधान्य, गाजर, काकडी, कोबी इत्यादी भाज्या खाणे पूर्णपणे टाळावे. कारण भाज्या पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. या दिवसांमध्ये पालेभाज्यांचे सेवन करताना विशेष काळजी घ्यावी.

नेहमीच पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर पाण्यात बडीशेप टाकून उकळी काढा आणि तयार केलेल्या पाण्याचे सेवन केल्यास पोटात वाढलेला जडपणा कमी होईल.

कायमच उकळवलेले पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमधील आणि पोटातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.






