
Sambhaji Nagar, Ambadas Danve, Shiv Sena, ZP Election, Maharashtra Politics,
ZP Election Sambhaji Nagar 2026 : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. आगामी सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वीच ‘व्हीप’ बजावण्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे आणि आमदार रमेश डोंगावकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कृष्ण डोंगावकर यांनी थेट अंबादास दावने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला फायदा व्हावा यासाठी व्हीप जारी केल्याचा आरोप केला आहे. पण अंबादास दानवे यांनी मात्रे डोंगावकरांचे हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. “हा व्हीप पक्ष नेतृत्वाच्या निर्देशानुसार जारी करण्यात आला होता.
कृष्ण डोंगावकर म्हणाले की, त्यांना सुरुवातीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. मात्र, निवडणुकीला काही तास शिल्लक असताना, पक्षाने अचानक व्हीप जारी करून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे निर्देश दिले.
बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापणार; महाविकास आघाडीत फूट पडणार? आता अंतिम निर्णय
अंबादास दानवे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या निर्देशानुसार घेण्यात आला होता आणि त्यांनी केवळ त्या आदेशाचे पालन केले होते. जर व्हीप जारी केला नसता, तर दुसऱ्या राजकीय पक्षाला फायदा झाला असता, त्यामुळे हा निर्णय पक्षाच्या सर्वोत्तम हितासाठी घेण्यात आला. तसेच, कृष्णा डोंगावकर यांनी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे, पक्षाची शिस्त राखण्यासाठी व्हीप जारी करणे आवश्यक होते, असही दानवेंनी स्पष्ट केलं.
सभापती निवडीसाठी कोणत्या गटाचा ‘व्हीप’ लागू होणार, यावरून दोन्ही बाजूंनी दावा-प्रतिदावा केला जात आहे. दानवे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे, तर डोंगावकरांनी हा दबावतंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याने निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे. सत्तेच्या समीकरणासाठी फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.