Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार-अजित पवार हे काका-पुतणे कधी वेगळेच झाले नाही; ‘या’ माजी मंत्र्याची टीका

सरकारने आमच्याकडून घेतलेले पैसे शेतकरी कर्जमाफीच्या स्वरूपात परत करावेत', अशी मागणीही कडू यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीसाठी 35 ते 40 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2025 | 07:14 AM
कुटुंब म्हणून आम्ही एकच

कुटुंब म्हणून आम्ही एकच

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील राजकीय मतभेद आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रमुख नेते शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर जनतेला काय फायदा होईल? वास्तवात, शरद पवार आणि अजित पवार कधीच वेगळे झाले नव्हते. हे केवळ एक ढोंग आहे’, असे बच्चू कडू म्हणाले.

प्रहारतर्फे सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडल्याचे म्हणत ‘प्रहार कार्यकर्त्यांसाठी निवडणुका आणि राजकारण हे प्राधान्य नाही. सार्वजनिक काम हे आमचे प्राधान्य आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमी भाव आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता सरकार याबाबत बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही अर्थमंत्री अजित पवार यांच्या बारामती ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरपर्यंत मोर्चा काढू. ही चळवळ 2 जूनपासून सुरू होईल’, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारने आमच्याकडून घेतलेले पैसे शेतकरी कर्जमाफीच्या स्वरूपात परत करावेत’, अशी मागणीही कडू यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीसाठी 35 ते 40 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी आम्ही झांज वाजवून निषेध करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही नेते एकत्र येण्याची जोरदार चर्चा

राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Web Title: Bachchu kadu criticized on ajit pawar and sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 07:11 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Bachchu Kadu
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान
2

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
3

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Manoj Jarange Andolan : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर! मनोज जरांगेंची आंदोलनाची हाक; 30 मे रोजी राज्यभर रणशिंग फुंकणार
4

Manoj Jarange Andolan : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर! मनोज जरांगेंची आंदोलनाची हाक; 30 मे रोजी राज्यभर रणशिंग फुंकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.