
नऊ राज्यांत प्रथमच भाजपचे मुख्यमंत्री
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय नोंदवून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपने नऊ राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रवासाची सुरुवात २०१४ मध्ये हरयाणा आणि महाराष्ट्रात झाली. त्यानंतर पक्षाने आसाम (२०१६), अरुणाचल प्रदेश (२०१६), मणिपूर (२०१७), त्रिपुरा (२०१८), ओडिशा (२०२४), बिहार (२०२६) आणि आता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपद मिळवले आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहीन ए. सिन्हा यांनी पक्षाच्या विस्ताराला राजकीय प्रवासातील ‘सुवर्णकाळ’ म्हटले आहे. दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळ ही दोन राज्ये वगळता, भाजपने देशभरात आपले मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे. आपले पहिले पूर्ण सरकार स्थापन केले. जुलै २०१६ मध्ये, दीर्घकाळ चाललेल्या राजकीय संकटाच्या काळात काँग्रेस नेते पेमा खांडू मुख्यमंत्री बनले, परंतु सप्टेंबरमध्ये ते आणि काँग्रेसचे बहुतेक आमदार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मध्ये सामील झाले.
काही महिन्यांनंतर, डिसेंबर २०१६ मध्ये, खांडू ३३ आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले, ज्यामुळे पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आणि राज्यात पहिले स्थिर सरकार स्थापन झाले. मणिपूर २०१७ मध्ये निवडणुकांनंतर, भाजपने नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आणि इतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करून मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले, ज्यात एन. बिरेन सिंग मुख्यमंत्री होते.
त्रिपुरा २०१८ मध्ये, भारतीय जनता पक्षाने बिप्लब कुमार देव यांच्या नेतृत्वाखाली आणि ही राज्ये पक्षाच्या भविष्यातील विस्तार योजनांचाही भाग आहेत. त्यांनी दावा केला की, आता देशाच्या बहुतांश भागांमध्ये भाजपचे मजबूत अस्तित्व आहे. त्रिपुरामध्ये आपले पहिले सरकार स्थापन करून डाव्या आघाडीच्या दशकांहून अधिक काळाच्या राजवटीचा अंत केला.
पटनाईक राजवटीचा अंत…
ओडिशा २०२४ मध्ये, त्यांनी पूर्व भारतात आणखी एक मोठे यश मिळवले, ओडिशामध्ये बिजू जनता दलाचा (बीजेडी) पराभव केला. मोहन चरण मांझी हे भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी नवीन पटनायक यांच्या २४ वर्षांच्या राजवटीचा अंत केला.
बिहारमध्ये चौधरीच खरे ‘सम्राट’
बिहारमध्ये, भाजप नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा दीर्घकाळ भाग होता. परंतु त्यांना स्वतःच्या मुख्यमंत्र्यासाठी २०२६ पर्यंत वाट पाहावी लागली, दोन दशकांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर, नितीश कुमार यांनी या वर्षी राजीनामा दिला आणि ते राज्यसभेत गेले. त्यांच्या राजीनाम्यानंतर, सम्राट चौधरी यांच्या रूपाने राज्याला भाजपचे पहिले मुख्यमंत्री मिळाले.