
'इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापनदिनाच्या मंचावरच म्यूट,' भाजपची संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड
शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून काल (19 जून) ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी स्वतंत्रपणे वर्धापनदिन साजरा केला. अश्यातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. एकीकडे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेली खळबळ आणि ‘ऑपरेशन टायगर’नंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र खासदार संजय राऊत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले नाही. यावरून आता नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
यावरूनच आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर चांगलीच टीका केली आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून संजय राऊतांना लक्ष करून त्यांनी “उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही!” म्हणत संजय राऊतांना ‘भोंगा‘ म्हणत डिवचले आहे.
Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या खासदारानंतर आता आमदारही फुटणार? आमदाराने नेमकं काय म्हटलं…
नवनाथ बन यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून संजय राऊतांवर टीका करत म्हंटले, “उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही! जनाब संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ आणि वल्गनांची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांचा डाव उधळून लावत राऊत यांना भाषणाची संधी दिली नाही. ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही, त्या संजय राऊत यांना स्वतःच्या पक्षाच्या वर्धापन दिनातच बाजूला बसवण्याची वेळ आली, यावरून उबाठामधील त्यांची घटती किंमत आणि वाढती अस्वस्थता स्पष्ट होते.”
उबाठा गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भोंगा वाजलाच नाही! जनाब संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ आणि वल्गनांची पूर्ण तयारी करून ठेवली होती. मात्र आदित्य ठाकरे यांनीच त्यांचा डाव उधळून लावत राऊत यांना भाषणाची संधी दिली नाही. ज्यांच्या भाषणाशिवाय दिवस उजाडत नाही, त्या संजय राऊत… pic.twitter.com/gf3Sru6kka — Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 20, 2026
आपल्या ट्विटमधून पुढे ते म्हणाले, “कालपर्यंत संपूर्ण पक्षाला रिमोटने चालवण्याचा आव आणणाऱ्या संजय राऊतांचा स्वतःचाच रिमोट आदित्य ठाकरे यांनी काढून घेतल्याचं दिसलं. रोज इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापन दिनाच्या मंचावरच म्यूट करण्यात आला. यातून आदित्य ठाकरे विरूध्द संजय राऊत या सामन्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं!” असे विधान त्यांनी यावेळी केले.
‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वर्धापनदिन भाषणादरम्यान फुटीर खासदारांबाबत बोलताना “हा तर फक्त ट्रेलर आहे, खरा चित्रपट अजून बाकी आहे,” असे विधान केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत आज (शनिवार, 20 जून) म्हणाले, “तुम्ही एकनाथ शिंदे यांना इतके गांभीर्याने का घेता? त्यांना गांभीर्याने घेणे थांबवा. ते काही महान व्यक्ती नाहीत. ते एक बेईमान नेते आहेत, तरीही तुम्ही त्यांना गांभीर्याने घेता? तुम्ही सुवेंदू अधिकारी यांनाही गांभीर्याने घेता. ही बेईमान माणसे आहेत. त्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला आहे. जोपर्यंत ते सत्तेत आहेत आणि त्यांच्या हातात पैसा आहे, तोपर्यंत ते अशीच विधाने करत राहतील…”