Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पण त्याआधी राज्यात झालेल्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी केल्याचे समोर आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 09, 2026 | 08:18 AM
Eknath Shinde

Eknath Shinde

Follow Us
Follow Us:

मुंबई : आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी शिकवू पाहणारे विरोधक स्वतः मात्र सत्तेसाठी संधीसाधूपणा, दुटप्पीपणाचा कळस करत अंबरनाथमध्ये भाजपशी हातमिळवणी केली, तेव्हा काँग्रेसची नैतिकता कुठे गेली होती, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. स्वतःच्या अभद्र युतीचे स्पष्टीकरण द्यावे आणि मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे, असा हल्लाबोलही शिंदे यांनी केला.

सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पण त्याआधी राज्यात झालेल्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी केल्याचे समोर आले. त्यानंतर काँग्रेसने निलंबित केलेल्या नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे. या प्रकरणावर शिंदे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात परखड भाष्य केले.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

ते म्हणाले की, ही युती महायुतीच्या विचारधारेच्या विरुद्ध होती. यावर भाजपच्या वरिष्ठांकडे मी विचारणा केली आहे. मी आधी त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोललो. ही युती आपल्या विचारविरोधात असल्याचे सांगितल्यावर त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले.

अंबरनाथमधील घडामोडी अशा…

अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेने २६ जागा जिंकल्या होत्या. भाजपने १४ जागांवर विजय मिळवला होता. पण, शिंदेसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजपने खेळी केली. काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेत त्यांनी अंबरनाथ विकास आघाडी काढली. यात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४ आणि १ पक्ष अशा ३१ नगरसेवकांचा समावेश होता.

काँग्रेसच्या नगरसेवकांना ‘तो’ निर्णय महागात

काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय महागात पडला. काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह निलंबित १२ नगरसेवकांनी प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

हेदेखील वाचा : Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ

Web Title: Dcm eknath shinde criticized on congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • Congress
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
3

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
4

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.