उद्धव ठाकरेंना मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
डोंबिवलीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का
अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
निवडणुकीनंतरदेखील पक्षांतर सुरूच
Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत. नुकत्याच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या काळामध्ये अनेक नेत्यांनी , कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले. मात्र अजूनही पक्षांतर सुरूच असून डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस महायुतीला मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच आता डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. डोंबिवलीमधील जिल्हाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह अनेक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”
टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक
ल्या काही दिवसांपासून राज्यात टिपू सुलतान वरून वाद सुरू आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. आज या सर्व विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले.
सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री टिपू सुलतान विषयवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. टिपू सुलतानच्या वैयक्तिक महानतेवर किंवा इतिहासावर कोणताही आक्षेप नसून त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यावर आक्षेप असल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले. या विषयावर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे या भूमीचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना वादग्रस्त इतिहास असणाऱ्या शासकाशी होऊ शकत नाही.” त्यांनी कॉँग्रेस आणि विरोधी पक्षांवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी विरोधकांवर तुष्टीकरणाचा आरोप केला.
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “टिपू सुलतानने ब्रिटिशांविरुद्ध लढाई केली हे खरे आहे. मात्र हे एक ऐतिहासिक सत्य आहे की, त्याने हजारो हिंदूंचे धर्मांतर केले आणि त्यांची हत्या केली. आमचा लढा कोणत्याही धर्माशी किंवा मुस्लिमांशी नाही. तर भारताच्या संस्कृतीवर हल्ला करणाऱ्या आक्रमकांचा गौरव करणाऱ्यांविरुद्ध आहे. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे आणि तो अपमान सरकार कदापि सहन करणार नाही. ”






