
‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
पालिकेत प्रशासकीय काळात मंजुर झालेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात प्रचंड गोंधळ झालेला असुन या योजनेसाठी आमचे नेते स्व. अजितदादा यांनी विशेष निधी उपलब्ध करुन दिलेला आहे, आता या योजनेसाठी पुढील ३० वर्ष पुन्हा निधी मिळणार नसल्याने ही योजना सक्षम व्हावी ही सामान्य म्हसवडकर जनतेची अपेक्षा होती मात्र योजनेचे काम अत्यंत ढिसाळ झाले असल्याने त्याविरोधात आम्ही आंदोलन केले तर सत्ताधारी गट हा आमच्यावर खंडणीचे आरोप करीत आहे, वास्तविक याच सत्ताधारी गटाने दीड वर्षापुर्वी सदर योजनेचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असे म्हणत या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन दिले होते, आता हेच सत्ताधारी मुख्याधिकार्यांवर आम्ही आरोप केल्यावर त्यांची सुपारी घेतल्याप्रमाणे बाजु मांडत आहेत. आता हे काम चांगले झाल्याचा त्यांना कसा साक्षात्कार झाला हे न उलघटणारे कोड आहे.
वास्तविक आम्ही म्हसवडकरांच्या प्रश्नावर बोलणार तो आमचा हक्क व अधिकार आहे असे सांगत किशोर सोनवणे यांनी हाती कागदी पुरावे घेत शहरातील रस्ते, गटार, शौछालय आदींची सध्या काय अवस्था आहे हे दाखवत प्रशासनावर कडाडुन हल्ला केला. ते पुढे बोलताना म्हणाले की माणगंगा नदीतुन सुरु असलेल्या वाळु उपसा कोणाकडुन सुरु आहे याची चौकशी मुख्याधिकारी करतील काय, अतिक्रमणाला अभय कोणाचे आहे असे प्रश्न उपस्थित करीत आमचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यावर जे बालबुध्दीने बोलतायेत त्यांनी हे लक्षात ठेवावे की आमचे नेते प्रभाकर देशमुख यांना एकदा नव्हे तर दोनवेळा देशाच्या पंतप्रधानांनी गौरवलेले आहे.
पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की म्हसवडकरांच्या समस्येसाठी यापुढे ही आम्ही आवाज उठवणार तर वेळप्रसंगी आंदोलने ही करणार तर खा. धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या मार्फत केंद्रीय जल आयोगामार्फत या योजनेच्या कामाची चौकशी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी युवा नेते तेजसिंह राजेमाने, अरविंद पिसे, परेश व्होरा, कांता ढाले आदी उपस्थित होते.
Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार