साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
केंद्र सरकारच्या २८ जुलैच्या आदेशानुसार १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साखरेवर साठा निर्बंध लागू आहेत. शासकीय संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता इतर विक्रेते व वितरकांना साखर मिळाल्यापासून ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही.
दरमहा १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर मिळाल्यापासून केवळ १५ दिवसांपर्यंतच साठा ठेवता येणार आहे. सर्व संबंधितांना अन्नसाठा देखरेख संकेतस्थळावर नोंदणी करून दर शुक्रवारी साठ्याची माहिती अद्ययावत करावी लागेल, प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली असून व्यापा-यांची गोदामे, पोत्याची संख्या, खरेदी-विक्री नोंदी आणि वाहतूक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. घोषित आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत किया नियमभंग आढळल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई केली जाईल.
कमी उत्पादन: हवामानातील बदल, अति पाऊस आणि उसावरील ‘रेड रॉट’ (तांबेरा) रोगामुळे उसाचे उत्पादन घटले आहे.
सणासुदीची मागणी: रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि आगामी सणांमुळे बाजारात साखरेची मागणी अचानक वाढली आहे.
कृत्रिम साठेबाजी: काही व्यापाऱ्यांनी मोठा साठा लपवून ठेवून बाजारात तुटवडा निर्माण केल्याने दर वाढले आहेत.






