
Sharad Pawar, Sunetra Pawar, Amit Shah, NCP Split, Maharashtra Politics, NDA Aliance,
Sharad Pawar Faction Split: शिवसेना ठाकरे गटाच्या हा खासदारांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. ठाकरे गटाच्या खासदारांच्या या पक्षांतराला अवघा आठवडाही लोटत नाहीत तोच राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसू लागली आहेत.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडखोरींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. शरद पवारांच्या गटातील आठ खासदार पाच खासदार भाजप आणि एनडीए’च्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ लोकसभा खासदारांपैकी पाच जण भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील होण्याचा विचार करत असल्याचा दावा केला जात आहे.या संभाव्य फुटीबाबत शरद पवारांच्या पक्षाकडून किंवा संबंधित खासदारांकडून कोणतेही अधिकृत निवेदन किंवा दुजोरा आलेला नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, पडद्यामागील चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात एका गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांच्या पक्षातील खासदांरांच्या बंडाच्या अफवांना अधिकच जोर मिळाला. या हायप्रोफाईल बैठकीच्या अजेंड्याबाबत दोन्ही बाजूंकडून पूर्ण गुप्तता बाळगली जात आहे. खास बाब म्हणजे याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
शरद पवार यांनी १९ जून रोजी आपल्या पक्षनेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. आपला संसदीय गट एकसंध ठेवणे आणि पक्षात फूट पाडण्याचे कोणतेही प्रयत्न रोखणे हा या बैठकीचा उद्देश होता. दरम्यान, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचा समावेश असलेल्या विरोधी आघाडी महाविकास आघाडी च्या आमदारांची सर्वसाधारण सभा २४ जून रोजी मुंबईत होणार आहे. या सभेत पक्षांतराच्या शक्यतेवर चर्चा होऊ शकते. तसेच विरोधी पक्षांसाठी संयुक्त रणनीती तयार केली जाईल, असे मानले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण नऊ खासदार होते. या बंडानंतर आता केवळ तीन खासदार उरले आहेत. या फुटीमुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या गोटात खळबळ उडाली आहे.