Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊगल्ली बंद; सरकारच्या फतव्यामुळे आंदोलकांचे होणार हाल?

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले आहे. यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, मुंबईतील खाऊगल्ली बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 29, 2025 | 12:14 PM
Manoj Jarange Patil Maratha reservation aandolan Mumbai khau galli closed Rohit Pawar slams

Manoj Jarange Patil Maratha reservation aandolan Mumbai khau galli closed Rohit Pawar slams

Follow Us
Close
Follow Us:

Maratha Reservation : मुंबई :  मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरु असून लाखो समर्थक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांना केवळ 5 हजार आंदोलकांसह एक दिवसीय आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. मात्र हजारो समर्थक मुंबईच्या विविध भागामध्ये दाखल झाले आहे.

मुंबईमध्ये मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सराकरकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये सरकारकडून मुंबईतील खाऊगल्ल्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या निर्णयामुळे आंदोलकांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून मोर्चामध्ये सामील झालेल्या आंदोलकांची मुंबईमध्ये खाण्याची तारांबळ होण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सरकारच्या निर्णयाला जाचक असल्याचे म्हटले आहे. यावरुन टीका करताना रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!” अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

Web Title: Manoj jarange patil maratha reservation aandolan mumbai khau galli closed rohit pawar slams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
1

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा
2

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय
3

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय

“सगळं काही पणाला लावलं पण…”; Jain Boarding House चा व्यवहार रद्द झाल्यावर धंगेकरांचे सूचक विधान
4

“सगळं काही पणाला लावलं पण…”; Jain Boarding House चा व्यवहार रद्द झाल्यावर धंगेकरांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.