सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने
विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरीने तेथील वातावरणाचा राजकीय पारा वाढला .जयकुमार गोरे पक्षाच्यावतीने बाजू मांडताना म्हणाले सभापती महोदया तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे .ज्याचे अपहरण झाले तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्याच्या कुटुंबीयांनी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम कोणी केले? याचे उत्तर देखील द्यायला हवे.
गोरे पुढे म्हणाले, माझ्या निवेदनाची संपूर्ण बाजू ऐकून घ्यायला हवी तुम्ही ऐकून घेत नाहीत मी देखील वस्तुस्थिती सांगत आहे तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या .यावर नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात पोलीस घुसले होते की नव्हते ते तुम्ही सांगा असे म्हणले .त्यावर जयकुमार गोरे म्हणाले सभापती महोदय तुम्ही कोणत्या प्रकारे वस्तूस्थिती जाणून न घेता एका अधिकाऱ्याला निलंबित करता कसं काय करता ? तो आयपीएस दर्जाचा अधिकारी आहे तुम्ही आज निलंबनाचा निर्णय घेतला तुमच्या निर्णयावर हरकत नाही मात्र जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे कार्यकर्ते कोणी आणले भाजपवर कसं काय आरोप करता तिथे जबरदस्ती सीईओ यांना बैठक कोणी घ्यायला लावली असे म्हणत गोरे यांनी निलंबनाच्या निर्णयाला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळाले. ही मागणी तात्काळ रद्द करावी असेही त्यांनी मागणी केली. शिवसेना आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. शिवसेनेचे आमदार उदय सामंत म्हणाले यांच्या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही भाजपचे नाव घेतलेले नाही त्यामुळे चुकीचे पटलावरून काढून टाका.
दरम्यान विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राड्याबाबतचा मुद्या उपस्थित केला. पोलीस अधीक्षक या निवडणूक प्रक्रियेत घरगड्यासारखे वागले असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांकडून आम्हाला धक्काबुक्की केली गेली. मला आज हे रेकॉर्डवर आणायचे आहे. १०० पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल त्यांनी केली. पोलीस अधीक्षक एका घरगड्या सारखा वागला आहे. त्याची चौकशी लावा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्या त्या तुषार दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी देसाई यांनी केली.






