
MLA Amol Mitkari makes social media post for Ajit Pawar on Holi festival
अजित पवारांच्या आठवणीमध्ये होळी
अमोल मिटकरी यांची खास सोशल मीडिया पोस्ट
मिटकरींनी व्यक्त केला अपघातावर संशय
Amol Mitkari Social Media Post : बारामती : दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचे महिनाभरापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झाले. हा अपघात होता की घातपात होता यावरुन राजकारण रंगले आहे. अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय घेतला जात असताना त्यांच्या पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भावनिक पोस्ट केली आहे. अमोल मिटकरी यांनी होळीच्या मुहूर्तावर अजित पवारांशिवाय होळी कशी साजरी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान क्रॅश झाले. यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. VSR कंपनीच्या विमानाचा हा अपघात झाला असून यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेत संशय व्यक्त केला आहे. पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अजित पवारांची अकाली एक्झिट ही धक्कादायक होती. यानंतर आता होळी सणावर देखील शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ
होळीच्या सणानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देत खास पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आदरणीय दादा जीवनातील रंगच घेऊन गेले …या वर्षीची होळी फक्त राख आणि आठवणींची धग आहे. ज्यांच्या नेतृत्वाने आयुष्य रंगले, त्यांच्याविना उत्सव कसा साजरा करायचा? म्हणून आता होळी नाही #बेरंग होळी मीस यू दादा,’ अशी सोशल मीडिया पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे.
आदरणीय दादा जीवनातील रंगच घेऊन गेले …
या वर्षीची होळी फक्त राख आणि आठवणींची धग आहे.
ज्यांच्या नेतृत्वाने आयुष्य रंगले, त्यांच्याविना उत्सव कसा साजरा करायचा?
म्हणून आता होळी नाही —#बेरंग होळी 🥹 miss u Dada pic.twitter.com/OUi5ckKRcV — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 2, 2026
हे देखील वाचा : इराणवरील हल्ल्यामुळे भारतात हिंसाचार भडकणार? गृह मंत्रालयाकडून ‘या’ राज्यात अलर्ट जारी
त्याचबरोबर मीडिया रिपोर्टनुसार,अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर संशय देखील व्यक्त केला. ते म्हणाले की, “विमान अपघात प्रकरणी तपास कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येत नाही. हवामान खराब असल्याचे कारण पटत नाही. विमान रडारवरुन अचानक गायब झालं. लॅंडिंग गेअरसोबत छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. इंधनात काही घटक समाविष्ट होते का? या विमानाचे पायलट सुमित कपूर जीवंत असल्याची माहिती समोर येत आहे. ते कॅलिफोर्नियात असल्याची माहिती मिळत आहे. सुमित कपूर हा जीवंत असेल तर DGCA ने आधी सहा माणसे विमानात होती सांगितली त्यानंतर पाच जणांचे मृतदेह आढल्याचे सांगितले. याचा अर्थ सुमित कपूर विमानामध्ये नव्हता आणि शांभावी पाठक विमान चालवत होती का?” असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.