
खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, 'भाजपच्या राजकारणाला एकच शब्द...'
मुंबई : राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाचे सात खासदार भाजपमध्ये गेले. भाजप राजकारण करत आहे. त्यांच्या राजकारणाला एकच शब्द आहे निर्लज्ज. चड्ढा या अगोदर भाजप गुंडाची पार्टी बोलत होते, अचानक भ्रष्टांकडे कसे गेले? बकासूर यांची भूक मिटत नाही, याची पार्टी बकासूरसारखी आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘भाजपची भूक मिटतच नाही. आमच्या पार्टीसारखं, एनसीपीसारखं झालं आहे. ट्रम्प बोलत होते भारत नरक राष्ट्र आहे असं म्हटलं ते बीजेपीसारखं दाखवत आहे. पार्टी सोडायला दबाव होता. पण आम्ही पार्टी सोडली नाही, ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते घाबरतात. विरोधी पक्ष कमजोर नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी पुढे जात आहे. उद्धव ठाकरे दुःखी आहे. यामध्ये संविधानाची हत्या झाली आहे. न्यायव्यवस्था जर बघत नसतील तर बागेश्वर धाममध्ये जाऊन न्याय मागावं लागेल किंवा त्यांना वकील म्हणून कोर्टात घेऊन जावं लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत की, काय तर भूमिका घेतली पाहिजे. मात्र, सध्या त्यांनी संयम ठेवला आहे. पण संयमचा विस्फोट होईल. आमचा विनयभंग करून झाला आहे. आम्ही उभे राहिलो आहे. आता खरात बाबाचे दोन पक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
केजरीवाल यांची भाजपवर टीका
राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडण्याच्या निर्णयानंतर राजकीय वातावरण अचानक तापले आहे. 7 खासदारांच्या फुटीनंतर प्रतिक्रिया देताना, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना केजरीवाल यांनी फक्त एका ओळीत आपले मत मांडले. त्यांनी लिहिले, “भाजपने पुन्हा एकदा पंजाबी लोकांचा विश्वासघात केला आहे.”