Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहार निवडणुकीसाठी एनडीएचं जागावाटप ठरलं? नितीश कुमारांचा जेडीयू लढवणार ‘इतक्या’ जागा

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने 115 आणि भाजपने 110 जागांवर उमेदवार उभे केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2025 | 09:34 AM
बिहार निवडणुकीत येणार रंगत; महागठबंधन आणि एनडीएमध्ये थेट लढत, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...

बिहार निवडणुकीत येणार रंगत; महागठबंधन आणि एनडीएमध्ये थेट लढत, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...

Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : बिहारच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोणता पक्ष, किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता बिहारमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यात नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू 102 जागा लढवणार असल्याची माहिती दिली जात आहे.

भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांच्यात जागावाटपाची सहमती झाली असून, लवकरच त्या संदर्भातील औपचारिक घोषणा केली जाणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने 115 आणि भाजपने 110 जागांवर उमेदवार उभे केले होते. उर्वरित जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या होत्या. आगामी निवडणुकीतही नितीश कुमार यांच्या पक्षाला भाजपपेक्षा एक जागा जास्त सोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एनडीएमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून, आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. जनता दल युनायटेड १०२ आणि भाजपा १०१ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची

चिराग पासवान यांनी जागावाटपाबाबत ठाम भूमिका घेतल्याचे दिसून येते. लोक जनशक्ती पार्टीला ४० जागा सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी सोमवारी केली. आम्ही आमच्या पक्षाला मिळालेल्या जागांवर कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले. भाजपातील सूत्रांनुसार, चिराग पासवान यांना ४० जागा हव्या आहेत. मात्र, त्यांना २० हून अधिक जागा देऊ नये, अशी भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांची भूमिका आहे.

बिहारचे राजकारण नितीशकुमार यांच्याभोवती

गेल्या अनेक दशकांपासून बिहारचे राजकारण हे नितीश कुमार यांच्या पक्षाभोवती फिरते आहे. त्यांच्याबरोबर युती केल्याशिवाय राज्यात सत्तास्थापन केली जाऊ शकत नाही, असे भाजपच्या काही नेत्यांचे मत आहे.

जागावाटपाची घोषणा 3 ऑक्टोबरनंतर

बिहारच्या निवडणूक समीकरणात जेडीयू आणि भाजप एकमेकांसाठी अविभाज्य आहेत. दरम्यान, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बिहारमधील सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीत कोणाचा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची आहे.

Web Title: Nitish kumars jdu will contest 101 seats in bihar election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • Bihar Election
  • Bihar Politics
  • Nitish Kumar
  • political news

संबंधित बातम्या

Mayor of Mumbai : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? रंगलं राजकारण; नितेश राणेंनी केलं खास ट्वीट
1

Mayor of Mumbai : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? रंगलं राजकारण; नितेश राणेंनी केलं खास ट्वीट

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
2

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप
3

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?
4

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.