
फुटीर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात
यावेळी संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. फुटीर खासदारांवर टीका करत ते म्हणाले, “लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं. एकनाथ शिंदेच्या विरोधात केलं, लोकांनी मशाल चिन्हाला मतदान केलं. हे सर्व लोक एकनाथ शिंदेंच्या पक्षविरोधात जिंकून आले आहेत. शिर्डीच्या खासदारने दोनवेळा गद्दारी केली. तरीही त्याला तिकीट दिल. काही लोकांना पक्षात घ्यायला माझा विरोध होता. ते पुन्हा पुन्हा बेईमानी करतील, असं मी सांगत होतो. पण, उद्धव ठाकरे दयाळू आहेत. त्यांनी या लोकांना संधी दिली. आता या लोकांना वाटतंय त्यांनी फार मोठा तिर मारलाय, पण हा तिर त्यांच्याच ***” असे म्हणत राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.
‘ऑपरेशन टायगर’बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना…; बावनकुळे यांचं मोठं विधान
पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय दिना पाटील आले नाही, ओमराजे पुण्यात आहेत. काल आणि आजही ते आले नाहीत. पण ते दोघेही त्यांच्यासोबत नाहीत.शिंदेगटाने त्यांना किडनॅप केलय का? त्यांच्या जीवाला काही धोका आहे का? हे लोक काहीही करू शकता,” असे ते म्हणाले.
“उद्धव ठाकरे स्वतः माहिती घेत आहेत. चार पाच खासदार म्हणजे पक्ष नाही. त्यांना खासदार बनवणारे कार्यकर्ता म्हणजे पक्ष आहे. आत लोक रस्त्यावर उतरले आहेत. तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवाच. तुम्हाला लष्कर घेऊन जावं लागेल. मशाल चिन्हावर तुम्ही निवडून आलात. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडून आलात. मोदी किंवा फडणवीसांच्या चेहऱ्यावर नाही. तुम्ही आमच्याकडून निवडून आलात. बेईमानी करत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या दुधाचा लिलाव केला. तुम्ही तुमच्या आईला विकलं,” असे म्हणत त्यांनी फुटीर खासदारांवर घणाघात केला.