
राज्यसभा निवडणूक बिनविरोध निश्चित
नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 जागांसाठी नेमके सातच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज राहिलेली नाही. बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे.
भाजपकडून 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना विशेष परिस्थितीही पाहायला मिळाली. तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना आजारी उमेदवाराच्या घरी जाऊन प्रक्रिया पार पाडण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांवर निवड जवळपास निश्चित झाली असून, आता केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
हेदेखील वाचा : Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. अतिरिक्त मतांच्या जोरावर शिंदे गट दुसरा उमेदवार देऊन निवडणूक रंगतदार करेल, अशी चर्चा होती. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने दुसरा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले आणि निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले.
हे देखील वाचा : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?
उमेदवारी जाहीर होताच विनोद तावडेंनी मानले आभार
“अनंत आभार आणि धन्यवाद! पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार! माननीय पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही नेहमीच देशहिताची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत. या नामांकनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार! ही नवीन जबाबदारी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने पार पाडण्यासाठी मी दृढ आणि वचनबद्ध आहे.