
राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचा पलटवार; मिसिंग लिंक वादावर भाजप-मनसे आमनेसामने
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार, 9 जुलै) रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका टीका केली. मिसिंग लिंक दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या विधानांवरून राज ठाकरे यांनी आज चांगल्याच शब्दांत समाचार घेतला. यावरून आता भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून भाजप आमदार राम कदम यांनी यावरून राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
राम कदम यावेळी म्हणाले, “आमिर खानच्या लग्नाला गेल्यावर आपण मराठी किती बोललात? मग मुख्यमंत्री यांनी भाषणात दोन ओळी हिंदीत बोललं तर काय झालं? मराठीचा आदर कायमच आहे. मुख्यमंत्री देवेन्द्रजी यांची ओळखच इन्फ्रामॅन अशी झाली आहे. धडाधड सर्वत्र काम सुरु आहेत. याची धास्ती विरोधकांना आहे. त्यामुळेच विरोधकांकडून टक्केवारीच्या गोष्टी करून बदनाम केलं जात आहे. रामाच्या अस्तित्वावर कायम काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. त्यांचा तो अजेंडा आहे. मिसिंग लिन्कवरचीडारद हा अपघात होता. लोक चांगल्या कामाबद्दल बोलत नाहीत. मात्र, त्रुटींबद्दल बोलतात,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
फडणवीसांवर टीका राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत भशान झालं. मिसिंग लिंक उत्तम दर्जाचं वैगेरे बोलले. टीका करणार्यांना बघून घेऊ म्हणतात, मुख्यमंत्री आहे ना तू? मग हिंदीमधून सुरु झाले. कोणासाठी हिंदी बोलला? विधानसभा महाराष्ट्राची. कदाचित आपल्याच पक्षातील वरच्याना सांगायचे आहे बघून घेईल,” असे ते म्हणाले.
“मिसिंग लिंकवर खांब कोसळला, पाणी आलं. म्हणे त्याच राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होतात. दुसऱ्याचं सरकार असताना तुम्ही काय करत होतात. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं? स्वतःच्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल? म्हणे, एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा.. लोक त्या मिसिंग लिंकवर बोलतात. महाराष्ट्राचा कुठे अपमान करतात. यांना केंद्र सरकारची सवय लागली आहे. केंद्राच्या कोणत्या गोष्टीवर बोललं तर तुम्ही देशद्रोही.” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी मोठ्या प्रमाणात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केला. त्यानंतर फडणवीसांनीं पावसाळी अधिवेशनात याबाबत बोलताना उलट विरोधकांवरच निशाणा साधत ‘महाराष्ट्राला बदनाम करू नका‘ असे वक्तव्य केले. यावरून आता मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या असून राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.