Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Dasara Melava Live 2025: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस 'मातोश्री'वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 02, 2025 | 10:33 PM
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर रामदास कदम यांचे मोठे विधान...(Photo Credit -X)

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर रामदास कदम यांचे मोठे विधान...(Photo Credit -X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’,
  • रामदास कदमांचा खळबळजनक आरोप
  • बाळासाहेबांचे मृत्युपत्र कधी करण्यात आले
मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगाव येथे पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या मेळाव्यात विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, त्यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या एका खळबळजनक आरोपाने सर्वांचे लक्ष वेधले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस ‘मातोश्री’वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

‘दोन दिवस मृतदेह का ठेवला होता?’

आपल्या भाषणात रामदास कदम म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची एकनाथ शिंदे यांनी माहिती काढावी अशी माझी विनंती आहे. मी हे विधान अत्यंत जबाबदारीने करत आहे.”

कदम यांनी पुढे म्हटले, “बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉक्टर आजही जिवंत आहेत. त्यांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेबांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता? त्यांचे अंतर्गत काय चालले होते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मृत्यूनंतर हाताचे ठसे घेतले?

रामदास कदम यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला. ते म्हणाले, “माझ्या कानावर आले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते. हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते, याचीही माहिती काढा.” या सगळ्यावर बोलताना कदम म्हणाले की, “मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो. मला सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी होतं? बाळासाहेबांचे मृत्युपत्र कधी करण्यात आले, त्यावर कोणाची सही होती, ही सगळी माहिती बाहेर काढा,” असे आवाहनही त्यांनी केले.

हे देखील वाचा: Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

एकनाथ शिंदेची विरोधकांवर जोरदार टीका

दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांना मदत म्हणून दिलेल्या वस्तू दिसत नाहीत. हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसतात.” एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे म्हणाले, “यांचे हिंदुत्व कॉँग्रेसच्या दावणीला बसले तेव्हा संपले.”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदासाठी , खुर्चीसाठी सगळे घालवले. पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? ह्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. गटप्रमुख नव्हे तर कटप्रमुख. शिवसैनिकच माझी संपत्ती आहे. यांना लोक सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करणार की नाही? स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना संपवणारा अध्यक्ष जगात कुठे झाला नसेल.”

हे देखील वाचा: Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Web Title: Ramdas kadams big statement on the death of balasaheb thackeray at shiv senas dussehra rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 10:33 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Dasara Melava
  • Maharashtra Politics
  • Ramdas Kadam
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
1

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप
2

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी
3

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ
4

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.