
शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या सहा खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे. पक्षांतरानंतर प्रथमच वाकचौरे शिर्डी मतदारसंघात दाखल झाले असता त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. मात्र या दौऱ्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. संजय राऊतांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ हॅण्डलवरून पोस्ट करत मोठे आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे गंभीर आरोप करत म्हटले की, “शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहाता पोलिस स्टेशनला शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणे ही सरकारची झुंडशाही आहे! (डरपोक गद्दार) भाऊसाहेब वाघ चौरे यांनी गद्दारी केल्यानंतर आज प्रथमच शिर्डी येथे आले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ! त्यांना कोणीही जाब विचारू नये, म्हणून सकाळी १० वाजल्यापासून शेकडो शिवसैनिकांना शिर्डी पोलिस स्टेशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, राहाते पोलीस स्टेशन येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.”
अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड
muख्यमंत्री फडणवीसांवर टीका करता ते पुढे म्हणाले, “फडणवीस गद्दार खासदार ज्या रस्त्याने प्रवास करत आहेत, ते रस्ते पूर्णपणे बंद करून ठेवण्यात आले आहेत. अहिल्यनगर पोलिसांना शिवसैनिकांना अटकेत ठेवण्याचे आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत का? ही सरकारी दहशत आहे का? उघडपणे फिरण्याची हिम्मत नाही, तर गद्दारी केली कशाला? अहिल्यानगर पोलिसांनी तत्काळ सर्व शिवसैनिकांना सोडावे! एसपी मुंमांका सुदर्शन यांना विशेष विनंती – ही अन्याय्य कारवाई थांबवा.” असे ते यावेळी म्हणाले.
शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहाता पोलिस स्टेशनला शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणे ही सरकारची झुंडशाही आहे!
(डरपोक गद्दार)
भाऊसाहेब वाघ चौरे यांनी गद्दारी केल्यानंतर आज प्रथमच शिर्डी येथे आले . मोठ्या पोलिस बंदोबस्तात !त्यांना कोणीही जाब विचारू नये, म्हणून सकाळी १० वाजल्यापासून शेकडो… — Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2026
दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले. मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचा दावा त्यांनी केला.
वाकचौरे म्हणाले की, आम्ही सहाही खासदार मतदारसंघाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झालो आहोत. हा मतदारांचा विश्वासघात नसून त्यांच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे. तसेच “माझ्या मतदारसंघात मी पाय ठेवणारच,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे गटातून सहा खासदारांनी बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आधीच ढवळून निघाले आहे. अशातच शिर्डीतील कथित नजरकैद प्रकरणामुळे आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली असून या प्रकरणावर सरकार किंवा पोलिस प्रशासनाकडून अधिकृत भूमिका येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.