Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. नितेश राणेंच्या या गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कणकवलीत गेल्या २० वर्षात झालेल्या खुनांचाही उल्लेख करत संजय राऊत म्हणाले की, कणकवलीत गेल्या २० वर्षात जेवढे खून झाले आहेत त्यात गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईक असे कित्येकांचे खून झाले. यांच्या हाताला रक्त लागलं आहे, जिभेला रक्त लागलं आहे, म्हणून तुम्हाला सत्तेची गरज आहे. खून पचवण्यासाठी आणि खून दाबण्यासाठी, असा टोला राऊत यांनी लगावला.
Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी
आता नाईकांचा खून कोणी केला? सत्यविजय भिसेला कोणी मारलं? अंकुश राणेचा खरा मारेकरी कोण ? गोवेकरला किडनॅप करून कोणी मारलं? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले. या सगळ्या प्रकरणांचा निष्पक्षपातीपणे तपास झाला असता, तर आज हे लोक उरलेच नसते. त्यांनी ही प्रकरणे दडपली, आता सीबीआय, महाराष्ट्राचे पोलीस, तपास यंत्रणा तुम्ही विकत घेतल्या. पण जरर हायकोर्ट या क्षणी कोणी आरोपी नाही आणि कोणाला टार्गेट करता येणार नाही, असं म्हणत असतानाही या उपटसुंभांनी हा खेळ सुरू केला, असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
तुम्ही ज्या पद्धतीने कुणाच्यातरी हातचं बाहुलं बनून ठाकरेंवर चिखलफेक करताय तो आमच्या प्रतिष्ठेचा, अब्रुचा प्रश्न नाही का, असा सवालही संजय राऊत यांनी केला. हा काही बेवड्यांचा आणि उरबडव्यांचा प्रश्न आहे, ते एकत्र आले आणि आता त्यांना कोणतीही कंट्रोल करत आहे. त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. ज्या व्यक्तीने त्या मृत तरूणीला कधी पाहिलेही नाही, कधी भेट झाली नाही, कोणता संबंध नाही, तिच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर चिखलफेक केली जात आहे. या प्रकरणात कोणालाही लक्ष्य करता येणार नाही, हे स्पष्ट केले असतानाही ही उपटसुंभ मंडळी अर्थपुरवठा घेऊन ठाकरेंना बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत.”
Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र






