Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काही पिलावळ स्वबळाचा नारा देत असतील, तर…” पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानामुळे महायुतीत ठिणगी?

पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आमदार शेखर निकम आणि भाजपचे नेते प्रशांत यादव यांच्यावर केली टीका केली आहे. यामुळे महायुतीत ठिणगी पडली आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 19, 2025 | 12:44 AM
'भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की...'; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

'भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की...'; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

Follow Us
Follow Us:

निसार शेख /चिपळूण: महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवण्याच्या तयारीत असतानाच, युतीतीलच काही मित्रपक्षांचे नेते “स्वबळावर” निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत. त्यांना खरंच स्वबळावर लढायचं असेल, तर त्यांनी ते करावं. मग काय करायचं ते आम्ही ठरवू, असा स्पष्ट इशारा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीमधील मित्रपक्षातील काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते म्हणाले, “वरिष्ठ नेते महायुती करण्यास तयार असताना, मित्रपक्षातील काही पिलावळ जर स्वबळाचा नारा देत असतील, तर त्यांना आपले धनुष्यबाण काय असते हे दाखवण्याची वेळ आली आहे.” या शब्दांत त्यांनी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

उदय सामंत पुढे म्हणाले की, “शिवसेनेने मदत केली नसती, तर येथे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम निवडून आले नसते. तरीदेखील ते स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगत असतील, तर त्यांनी एकदा माजी आमदार सदानंद चव्हाण आणि मला सांगावे. नाहीतर नुसती चिवचिव सहन केली जाणार नाही.” त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील दोन मित्रपक्षांच्या नेत्यांना थेट इशारा दिला असून, त्यांच्या या विधानामुळे महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.

धनुष्यबाणाची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे

उदय सामंत म्हणाले, “जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात शिवसेनेची (शिंदे गट) मजबूत पकड आहे. तरीही आम्ही महायुतीसाठी आग्रही आहोत. आमचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, आणि आम्ही तो मान्य करू.”

“मात्र, युतीत राहूनच स्वबळाची भाषा करणाऱ्यांनी खरंच तसे करायचे असेल, तर त्यांनी खुलेपणाने जाहीर करावे. मग आम्हीही आमचा निर्णय घेऊ. आता वेळ आली आहे धनुष्यबाणाची ताकद दाखवण्याची,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शेखर निकम यांना टोला, प्रशांत यादव यांना अप्रत्यक्ष इशारा

सामंत यांनी चिपळूणमधील अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्यावर निशाणा साधला. “ते जर स्वबळाची भाषा करत असतील, तर त्यांनी ती उघडपणे मांडावी. आमचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे,” असे ते म्हणाले.

तसेच भाजपचे नेते प्रशांत यादव यांनाही अप्रत्यक्षपणे इशारा देताना उदय सामंत म्हणाले, “कालपर्यंत जे लोक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करत होते, आमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवत होते, ते आता चौकशीच्या भीतीने भाजपमध्ये गेले, असे लोकच सांगत आहेत. त्यांनीही फार ढवळाढवळ करू नये.”

संघटना मजबूत करा, नम्रपणे पक्ष वाढवा

“आता वेळ आली आहे की प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात संघटना कशी मजबूत होईल, याकडे लक्ष द्यावे. दुसऱ्याच्या भागात न डोकावता आपले काम प्रामाणिकपणे करावे. नम्रपणे पक्ष वाढवण्याची हीच आमची आणि आमच्या नेत्यांची भूमिका आहे. कोणी काही बोलले म्हणून आपण काम थांबवायचं नाही. आपल्याला पक्षाचे अस्तित्व मतांमध्ये कसे परिवर्तन करेल, हे बघायचं आहे,” असे सामंत यांनी स्पष्ट केले.

‘लाडकी बहिण’ योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंना

राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजनेविषयी बोलताना ते म्हणाले, “या योजनेतून राज्यातील तीन कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत. याचे संपूर्ण श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे लागेल. त्यांनी अनेक लोकाभिमुख योजना आणल्या असून, त्या योजनांचा प्रचार-प्रसार कार्यकर्त्यांनी करावा.”

मुस्लिम समाजात विष पेरण्याचा आरोप

महाविकास आघाडीवर टीका करताना सामंत म्हणाले, “मुस्लिम समाजात विष पेरण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साबीर शेख यांच्यासारख्या मुस्लिम नेत्याला मंत्रीपद दिले होते. शिवसेना नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेते आणि तसंच काम करत आहे.”

या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख संदेश आयरे, रूपेश घाग, निहार कोवळे, दिलीप चव्हाण, शशिकांत चाळके, सिद्धार्थ कदम, संदीप सावंत, रश्मी गोखले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Uday samant critisise shekhar nikam and prashant yadav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • shivsena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
1

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

भाजपच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद, ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला; काँग्रेसचा दावा
3

भाजपच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद, ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला; काँग्रेसचा दावा

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.