Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ममतांसारखीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल’; राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची टीका

संजय राऊत जाणूनबुजून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे जनतेने त्यांना नाकारले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 06, 2026 | 01:38 PM
'ममतांसारखीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल'; राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची टीका

'ममतांसारखीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल'; राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची टीका

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : काँग्रेसच्या संपर्कात आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत पूर्णपणे मानसिक दिवाळखोर झाले आहेत, असा हल्लाबोल राज्यमंत्री आशिष जायसवाल यांनी राऊत यांच्यावर चढवला. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटाच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालावर म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पतनाची सुरुवात झाली आहे आणि म्हणीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, दिवा विझण्यापूर्वी त्याची ज्योत तेज होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जायस्वाल यांनी त्यांना भ्रष्ट बुद्धीचे जिवंत उदाहरण म्हटले.

आशिष जायस्वाल यांनी दावा केला की, संजय राऊत जाणूनबुजून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे जनतेने त्यांना नाकारले, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) ची होईल.

कृषी संकटावर मात करण्यास सरकार सज्ज

राज्यातील कृषी संकटाबाबत त्यांनी सांगितले की ‘अल निनो ‘च्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला तरी सरकार परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रासायनिक खतांच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना गरजेपेक्षा अधिक खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले की आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

ठाकरेंचा विदर्भावर अन्याय

उद्धव ठाकरे यांच्या काळात विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप करत जायसवाल म्हणाले की, ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील एकाही कार्यकर्त्याला विधान परिषदेत संधी मिळाली नव्हती. एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना संधी देऊन विदर्भाचा सन्मान राखला. मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, शिंदे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि कोणाला कोणते मंत्रालय द्यायचे, हा त्यांचा विशेषाधिकार आहे. मला कॅबिनेट मंत्रिपदाबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच ! पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; काय आहेत राज्यपालांचे अधिकार?

Web Title: Uddhav thackeray party will face the same situation as mamata banerjee says ashish jaiswal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त
1

West Bengal Politics: बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ; अखेर राज्यपालांकडून ममता बॅनर्जींचे मंत्रिमंडळ बरखास्त

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांचा मोठा दावा; “हा ममता बॅनर्जींचा नाही, लोकशाहीचा पराभव”
2

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांचा मोठा दावा; “हा ममता बॅनर्जींचा नाही, लोकशाहीचा पराभव”

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच! पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; काय आहेत राज्यपालांचे अधिकार?
3

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच! पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; काय आहेत राज्यपालांचे अधिकार?

Mamata Banerjee: “आम्ही हारलो नाही, लोकशाहीची हत्या झाली!” ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
4

Mamata Banerjee: “आम्ही हारलो नाही, लोकशाहीची हत्या झाली!” ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.