Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बऱ्याच घरात सतत वाद होतात, एकमेकांवर संशय घेतला जातो. अशा वेळी घरातली शांतता निघून जाते. हे सगळं थांबवून नवरा बायकोत राधा-कृष्णासारखं निर्मळ प्रेम यावं यासाठी येत्या ४ सप्टेंबरला जन्माष्टमीचा दिवस खूप चांगला आहे. या दिवशी काही जुने उपाय केले तर नक्की फायदा होतो असं म्हटलं जातं. Janmashtami 2026:
कधी कधी घरात पितृदोष असतो, कुलदेवतेचा कोप असतो किंवा वास्तूमध्ये काही दोष असतो. त्यामुळे नवरा बायकोत विनाकारण भांडणं होतात. घरात नकारात्मकता येते. यासाठी पहिल्यांदा चांगल्या गुरुजींना विचारून पितृदोषाची शांती करून घ्या. आपल्या कुलदेवतेचं टाक असतं त्याची पूजा, कुलाचार वेळेवर करत जा. घरातला पसारा काढा, वास्तुदोष असेल तर तो पण काढून घ्या. घरातली नकारात्मक ऊर्जा गेली की आपोआप शांतता येते.
पत्रिकेत जर शनी, राहू किंवा मंगळाचा त्रास असेल तर पण नात्यात कटकटी येतात. अशा वेळी त्या ग्रहाचा जप, होम किंवा दान करावं. त्याचबरोबर घरात चांगली ऊर्जा येण्यासाठी ग्रंथ वाचणं खूप चांगलं असतं. रोज सकाळी ‘गुरुचरित्र’, ‘स्वामी समर्थ चरित्र’, ‘साई चरित्र’ यासारख्या पवित्र ग्रंथाचं थोडं तरी वाचन करा. याने मन शांत होतं आणि घरातलं वातावरण पण चांगलं राहतं.
ज्या घरात भांडण खूप वाढलं आहे, घटस्फोटापर्यंत वेळ आली आहे, दोघांपैकी एकाला वेगळं व्हायचं आहे, अशा लोकांसाठी एक खास उपाय आहे. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली ‘रुक्मिणी स्वयंवर’ ही पोथी यासाठी खूप प्रभावी मानली जाते.
त्यासाठी आधी संकल्प करायचा.
संकल्प – मम वैवाहिक जीवन कर्माणि उत्पन्नांना विविध प्रत्यवायांना समूल परिहारपूर्वक पुनः मिलन सिद्धी द्वारा अद्यारंभ करिष्ये ।।हा संकल्प म्हणून मनापासून रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचायला सुरुवात करा. एका दिवसात पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर रोज एक अध्याय तरी वाचा. श्रद्धेने वाचलं तर तुटलेलं नातं परत जुळतं असं जुने लोक सांगतात.
४. सोळा सोमवार करानवरा बायकोने दोघांनी मिळून किंवा दोघांपैकी एकाने सोळा सोमवारचं व्रत करावं. दर सोमवारी संध्याकाळी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जावं. तिथे शंकराच्या पिंडीवर एक नारळ अर्पण करा, कणकेचा दिवा करून त्यात साजूक तूप टाकून लावा आणि एक मूठ नागकेशर वाहा. महादेव हा संसाराचा देव आहे, त्याच्या कृपेने संसारातले अडथळे दूर होतात.
५. श्रीकृष्णाचा जप कराजर नवरा वाईट संगतीला लागला असेल, व्यसन करत असेल किंवा दुसऱ्या बाईच्या नादी लागला असेल तर अशा वेळी बाईने श्रीकृष्णाची भक्ती करावी. कृष्ण हा स्त्रियांचा रक्षक आहे. रोज रात्री ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. वेळ असेल तर विष्णु सहस्रनाम पण वाचा. याने मनाला खूप आधार मिळतो आणि बिघडलेली परिस्थिती हळूहळू सुधारते.शेवटी एकच लक्षात ठेवा, फक्त पूजा करून काही होत नाही.
नवरा बायकोत एकमेकांबद्दल आदर हवा, एकमेकांशी मनमोकळं बोलणं हवं. राधा आणि कृष्णाचं प्रेम जसं निस्वार्थ होतं तसं आपल्या नात्यात पण समजूतदारपणा आणा. उपायांसोबतच प्रयत्न पण केले तर मोडकळीस आलेला संसार पुन्हा नक्की फुलेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






