
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये सण व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्र रविवार, 15 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुर्मिळ योग तयार होणार आहेत त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ही महाशिवरात्र खूप खास मानली जाते. या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. या योगामुळे काही लोकांना लाभ होऊ शकतो.
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाची शिवरात्र ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या दिवशी आकाशात ग्रहांचे अनेक दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून येत आहेत. विशेषतः ‘शुक्रादित्य राजयोग’, ‘चतुर्वेही योग’ आणि ‘सर्वार्थ सिद्धी योग’ यांचा त्रिवेणी संगम होत असल्याने, काही राशींच्या नशिबात अचानक धनलाभाचे संकेत मिळत आहेत.
यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि सुख-समृद्धीचा कारक शुक्र हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत एकत्र असतील, या युतीमुळे ‘शुक्रादित्य योग’ निर्माण होत आहे. याशिवाय याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सूर्योदयापासून रात्रीपर्यंत असणार आहे. नावाप्रमाणेच हा योग ‘सर्व अर्थ सिद्ध’ करणारा असतो. पंचांगानुसार, याच रात्री चंद्रदेखील धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल आणि मंगळ ‘धनिष्ठा’ नक्षत्रात असेल.
मेष राशीच्या लोकांसाठी हे दुर्मिळ संयोग वरदान ठरतील, ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, नोकरीत बढ़ती किंवा पगारात मोठी वाढ होऊ शकते, महादेवाच्या कृपेने तुमचा मानसिक ताण दूर होईल आणि प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे वेग घेतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री भाग्योदय करणारी ठरेल, करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल आणि उत्पन्नाचे
नवीन खोत निर्माण होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किवा गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांना आनंदाची बातमी मिळेल. तुमची एखादी मोठी इच्छा या दिवशी पूर्ण होऊ शकते.
कुंभ राशीतच सूर्य आणि शुक्राची युती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय खास आहे. तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक पावलावर मिळेल, नवीन नौकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि यशधारात मोठी प्रगती दिसेल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: तिथी, वार, नक्षत्र आणि ग्रहस्थिती अनुकूल जुळून आल्यास विशेष शुभ संयोग तयार होतो, ज्याला दुर्मिळ योग म्हणतात.
Ans: आध्यात्मिक उन्नती, अडथळ्यांवर मात, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घडतात असे मानले जाते.
Ans: दुर्मिळ योगाचा मेष, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार