Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parshuram Jayanti: काश्यप ऋषींचा सल्ला आणि परशुरामांचा संकल्प, कोकण वसवण्यामागची काय आहे कथा जाणून घ्या

भगवान परशुराम म्हणजे क्षात्रतेज आणि ब्राह्मण तेजाचे समुच्चय. २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर त्यांनी. काश्यप ऋषींच्या सल्लांने जिंकले प्रदेश दान केले. त्यांच्या सल्ल्याने नवीन कोकण भूमी वसवली.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 19, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • परशुराम जयंती कधी आहे
  • काश्यप ऋषींचा सल्ला आणि परशुरामांचा संकल्प
  • कोकण वसवण्यामागची काय आहे कथा
 

काश्यप सल्ल्याने कोकण भूमीची केली निर्मिती

काश्यप ऋषींच्या सल्ल्याने आणि पौराणिक कथेनुसार, परशुरामाने संपूर्ण पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली होती. दान दिलेल्या भूमीवर आपला हक्क उरत नाही, या नियमामुळे स्वतःच्या निवासासाठी आणि तपश्चर्येसाठी परशुरामांनी समुद्राला मागे हटवून कोकण भूमीची निर्मिती केली.

क्षत्रियविनाशानंतर भूमी दान आणि वसाहत

महाभारताच्या शांतिपर्वात उल्लेख केल्याप्रमाणे आणि पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती. त्यामुळे आसुरी शक्तींनी उच्छाद मांडलाय सुरुवात केला होता. त्यामुळे काश्यप ऋषींनी यात हस्तक्षेप करून भगवान परशुरामांना रोखले. त्यांनी जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. जिंकलेली पृथ्वी मला दान दे आणि स्वतःसाठी नवी भूमी निर्माण कर.” तेव्हा कश्यप ऋषींचा सल्ला मान्य केला आणि नवीन निर्माण केलेल्या कोकणाची भूमी सुपीक बनवण्यासाठी आणि वसतीयोग्य करण्यासाठी परशुरामाने कश्यप ऋषींच्या सल्ल्याने उत्तर भारतातून ब्राह्मणांना बोलावले. तसेच, त्यांनी सांबाच्या (चितेच्या) कडेला राहणाऱ्या स्थानिक लोकांना सांगाडा (चित्पावन) म्हणून जिवंत केले आणि त्यांना तिथे वसवले, असे मानले जाते.

Akshaya Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया, काय आहे अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या

पुराणपरंपरेतील कोकण निर्मितीचे महत्त्व

भारतीय पुराणपरंपरेत भूमी, धर्म आणि मानवसंस्कृती यांचा परस्पर संबंध अत्यंत सूक्ष्म आणि गूढ स्वरूपाचा आहे. अशाच एका दंतकथेमध्ये परशुराम आणि काश्यप ऋषी यांच्या मार्गदर्शनातून कोकण भूमीची निर्मिती आणि वसाहत यांचा उल्लेख आढळतो. ही कथा केवळ पौराणिक नाही, तर भारतीय सांस्कृतिक चेतनेचा एक गाभा आहे. जी भूमीच्या पवित्रतेबरोबरच मानवाच्या कर्तृत्वाचीही साक्ष देते.

परशुराम जीवनातील परिवर्तन आणि काश्यप सल्ला

परशुराम भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहेत. त्यांनी क्षत्रियांच्या अन्यायाविरुद्ध उभा ठाकत धर्मसंस्थापनेसाठी कठोर मार्ग स्वीकारला. परंतु, त्यांच्या आयुष्यातील एक टप्पा असा आला, जेव्हा त्यांनी युद्धाचा मार्ग सोडून तपश्चर्या आणि समाजरचना याकडे वळण्याचा निर्णय घेतला. याचवेळी काश्यप ऋषींनी त्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला. “तू जिंकलेली पृथ्वी मला दान दे आणि स्वतःसाठी नवी भूमी निर्माण कर.”

हा सल्ला केवळ वैयक्तिक नव्हता; तो सामाजिक पुनर्रचनेचा पाया होता. परशुरामांनी तो स्वीकारला आणि समुद्राला मागे हटवून नवी भूमी निर्माण करण्याचा अद्भुत संकल्प केला. त्यांनी आपल्या परशु (फरसा) समुद्रात फेकला आणि त्या ठिकाणापर्यंत समुद्र मागे सरकला, असे मानले जाते. हीच भूमी पुढे “कोकण” म्हणून ओळखली जाऊ लागली. सह्याद्रीच्या पायथ्यापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेली हिरवीगार, सुपीक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पट्टी.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व

वसाहतीतून सांस्कृतिक केंद्र म्हणून कोकण

परंतु भूमी निर्माण करणे हा केवळ आरंभ होता; खरी कसोटी होती ती तिचे वसतीकरण. काश्यप ऋषींनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार, परशुरामांनी विविध प्रदेशांतील ब्राह्मण, शेतकरी, कारागीर आणि व्यापारी यांना येथे वसवले. त्यांनी जलव्यवस्था, शेती, मंदिरे आणि सामाजिक संरचना उभी केली. त्यामुळे कोकण केवळ भौगोलिक प्रदेश राहिला नाही, तर तो एक सजीव सांस्कृतिक केंद्र बनला.

ही कोकणभूमी ही केवळ भौतिक संपत्ती नसून ती संस्कार, परंपरा आणि श्रम यांची साठवण आहे. काश्यप ऋषींच्या दूरदृष्टीने आणि परशुरामांच्या कृतीशीलतेने कोकण भूमीला एक नवे जीवन दिले.

कोकणाची निर्मिती ही केवळ एक दंतकथा नसून, ती भारतीय मनाच्या सर्जनशीलतेची आणि सांस्कृतिक सातत्याची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. काश्यप ऋषींच्या सल्ल्याने आणि परशुरामांच्या कृतीने उभी राहिलेली ही भूमी आजही आपल्या परंपरेचा, श्रद्धेचा आणि कर्तृत्वाचा अभिमान आहे. कोकणात परशुरामाचे मंदिर आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तेथे मोठा उत्सव होतो. भक्तीभावाने भगवान परशुरामाची पूजा अर्चा केली जाते..

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: परशुराम जयंती म्हणजे काय?

    Ans: परशुराम जयंती हा भगवान परशुराम यांच्या जन्माचा उत्सव असून तो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साजरा केला जातो.

  • Que: कोकण भूमीची निर्मिती कशी झाली?

    Ans: पौराणिक कथेनुसार, परशुरामांनी आपला परशु समुद्रात फेकला आणि त्या ठिकाणापर्यंत समुद्र मागे हटला. त्यामुळे कोकण भूमी निर्माण झाली.

  • Que: कोकणात वसाहत कशी झाली?

    Ans: परशुरामांनी काश्यप ऋषींच्या सल्ल्याने ब्राह्मण, शेतकरी आणि इतर समाजघटकांना येथे वसवले, ज्यामुळे कोकण प्रदेश विकसित झाला.

Web Title: Parshuram jayanti the story behind the advice of sage kashyap and the resolve of parashurama to settle konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Akshaya Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया, काय आहे अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या
1

Akshaya Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया, काय आहे अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या

zodiac sign: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार भाग्यशाली
2

zodiac sign: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार भाग्यशाली

Numberlogy: अक्षय्य तृतीयेचा दिवस सर्व मूलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: अक्षय्य तृतीयेचा दिवस सर्व मूलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व
4

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.