
Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
ऋषीपंचमीच्या दिवशी आंघोळ झाल्यावर किंवा पूजेच्या वेळी हा श्लोक म्हणायचा असतो:कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः । जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ॥याचा अर्थ सोपा आहे. कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सात ऋषी आपल्याला ज्ञान देणारे मानले जातात. या सात जणांचं नाव जरी घेतलं तरी मन शांत होतं आणि आयुष्यातले अडथळे दूर होतात असं धर्मात सांगितलं आहे. Rishi Panchami 2026:
आपल्या ऋषींनी जंगलात तप करून वेद, उपनिषद, आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणित हे सगळं ज्ञान आपल्याला दिलं. आपण ज्या गोत्रात जन्मलो, जे ज्ञान आपण वापरतो, ते त्यांच्यामुळेच. त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही, पण निदान त्यांची आठवण ठेवून आभार मानण्यासाठी हा दिवस आहे.आपल्या हातून रोज कळत-नकळत चुका होतात, छोटे जीव मारले जातात, बोलण्यातून कोणाला दुखावलं जातं. या सगळ्या दोषांचं क्षालन व्हावं, मन साफ व्हावं म्हणून हे व्रत केलं जातं.
ऋषीपंचमीला न नांगरलेल्या जमिनीत उगवलेल्या भाज्या खातात. म्हणजे जिथे बैलांनी कष्ट केले नाहीत अशा रानभाज्या. अळू, माठ, लाल भोपळा, तोंडली, दोडकी, सुरण, शिराळं अशा भाज्या एकत्र करून त्यात कंदमुळे आणि नारळाचं दूध टाकून ही भाजी बनवतात.यामागे दोन मोठी कारणं आहेत.पहिलं म्हणजे बैलांना आराम. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एक दिवस तरी सुट्टी मिळावी, हा विचार. किती साधा पण किती मोठा विचार आहे.दुसरं म्हणजे तब्येत. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी झालेली असते. या रानभाज्या नैसर्गिक असतात, त्या शरीरातले विषारी घटक बाहेर काढतात, पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
सकाळी लवकर उठून आघाड्याच्या काडीने दात घासायचे आणि अंगाला तीळ लावून आंघोळ करायची अशी परंपरा आहे. नंतर पाटावर सात सुपाऱ्या किंवा तांदळाच्या राशी मांडून त्यावर सप्तर्षी आणि अरुंधतीची स्थापना करायची.
“हे ऋषींनो, आमच्या हातून शरीराने, मनाने किंवा बोलण्यातून काही चूक झाली असेल तर माफ करा. आम्हाला चांगली बुद्धी, चांगले विचार आणि चांगलं आरोग्य द्या.”फक्त जिभेचे चोचले म्हणून भाजी खाऊ नका. या दिवशी ऋषींनी दिलेल्या ज्ञानाची आठवण ठेवा आणि निसर्गाचा आदर करा. तरच खरी ऋषीपंचमी साजरी होईल.