
Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यंदाची जन्माष्टमी जवळच आली आहे. पण एक प्रश्न कधी तुमच्या मनात येतो की कृष्ण हे नाव त्याला कोणी दिलं?यंदा जन्माष्टमी कधी आहे? २०२६ मध्ये जन्माष्टमी शुक्रवारी, ४ सप्टेंबरला आली आहे. हा दिवस भाद्रपद महिन्यातील अष्टमीचा आहे. मुख्य पूजा मध्यरात्री होईल. सगळीकडे या दिवशी उपवास करून रात्री कृष्ण जन्म साजरा केला जाईल. कृष्णाचे नाव कोणी ठेवले?श्रावण महिना हा कृष्ण भक्तीसाठी खास असतो. कृष्णाचा जन्म याच महिन्याच्या आसपास अष्टमीला झाला म्हणून या महिन्याला जास्त महत्त्व आहे. Krishna Janmashtami 2026:
महर्षी गर्गाचार्य यांनी कृष्णाचे नाव ठेवले . त्यांना गर्ग मुनी म्हणून पण ओळखतात. ते यादव कुळाचे कुलगुरू होते. त्यामुळे नवीन बाळाचे नाव ठेवण्याचा अधिकार त्यांचाच होता. पण ही गोष्ट साधी सरळ नव्हती. यामागे एक मोठी गुप्तता होती. आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल. कंसाने देवकी आणि वासुदेवाला कारागृहात टाकले होते. आणि त्यांच्या सात मुलांना मारले होते.
जेव्हा आठवा मुलगा म्हणजे कृष्ण जन्माला आला तेव्हा वासुदेवाने रातोरात त्याला यमुना ओलांडून गोकुळात नंदबाबा आणि यशोदा मातेकडे नेऊन ठेवले. त्यामुळे नंदबाबांच्या घरी दोन मुले होती, एक रोहिणीचा मुलगा बलराम आणि दुसरा यशोदेकडे कृष्ण आलेला होता. नंदबाबांना वाटले की, आपल्या मुलांचे नामकरण मोठ्या थाटात करूया. त्यांनी गर्गाचार्यांना गोकुळात बोलावले.
पण गर्गाचार्यांना एक भीती होती. जर मी उघडपणे गोकुळात गेलो आणि नामकरण केले तर कंसाला संशय येईल. कंसाला कळेल की देवकीचा मुलगा जिवंत आहे आणि गोकुळात आहे.म्हणून गर्गाचार्यांनी एक युक्ती केली. ते कोणाला न सांगता लपत छपत गोकुळात गेले. त्यांनी नंदबाबांना सांगितले की हा सोहळा गुपचूप करूया, कोणताही मोठा कार्यक्रम नको.
मग गायीच्या गोठ्यात, सगळ्यांपासून लपून हा नामकरण विधी झाला. तिथे गर्ग मुनींनी दोन्ही मुलांची नावे ठेवली. रोहिणीच्या मुलाचे नाव बलराम ठेवले कारण तो खूप बलवान होणार होता. आणि त्याचे दुसरे नाव संकर्षण पण ठेवले.आणि दुसऱ्या मुलासाठी ते म्हणाले, या मुलाने याआधी अनेक युगात वेगवेगळे अवतार घेतले आहेत. कधी तो पांढरा होता, कधी लाल होता, कधी पिवळा होता.
आता या युगात तो काळ्या रंगात म्हणजे कृष्ण वर्णात जन्माला आला आहे, म्हणून याचे नाव कृष्ण असेल.कृष्ण म्हणजे काळा, जो सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो तो.अशा प्रकारे जगाचा तारणहार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे नाव एका गोठ्यात, अगदी साधेपणाने आणि गुप्तपणे ठेवले गेले. जर मोठा सोहळा केला असता तर कदाचित कंसाला समजले असते आणि इतिहास वेगळा झाला असता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)