
होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण
देशभरात होळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी सणाला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधीपासूनच लहान मुलं रंग लावण्यास सुरुवात करतात. एकमेकांना रंग लावल्याशिवाय होळी साजरा झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. पार्टीमध्ये अनेक लोक आवडीने भांग पितात. होळी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भांग प्यायला जातो. वेदांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये भांगचा उल्लेख करण्यात आला आहे. आयुर्वेदिक भांग प्यायल्यामुळे केवळ शारीरिक व्याधीच नाही तर मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
Holi 2026: शीख धर्माचे लोक कशी साजरी करतात होळी? काय आहे यातील वेगळेपण
भारतीय संस्कृतीत खानपानला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. होळीच्या सणाला गुझिया आणि थंडाईलाही मोठे महत्त्व आहे. हे ते पेय आहे, जे थंडी जाण्याच्या आणि उन्हाळा येण्यादरम्यान टेस्टी आणि पौष्टिक आहार मानला जातो. पण, होळीमध्ये याचा थेट संबंध हा भांगसोबत असतो. भांग आणि होळीचा संबंध हा पारंपरिक आहे. भांगचा सरळ संबंध भगवान शंकरासोबत आहे. होळीसह भांगची परंपरा यामागे शंकरजींची कुठलीही कहाणी नाही.
एका आख्यायिकेनुसार शिव वैराग्यात होते आणि आपला तप करत होते. पार्वतीची अशी इच्छा होती की त्यांनी ही तपस्या सोडावी आणि दाम्पत्य जीवनाचं सुख भोगावं, तेव्हा कामदेवाने फूल ‘बांधून एक बाण शंकरजींच्या दिशेने सोडला जेणेकरुन त्यांची तपस्या भंग व्हावी.या कहाणीनुसार, वैराग्यापासून शंकरजी गृहस्थ जीवनात परतण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी भांगचं प्रचलन सुरु झालं, पण याच्या तर आणखी अनेक कथा प्रचलित आहेत. एका आणखी अख्यायिकेनुसार, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्यांचे भक्त भांगचं सेवन करतात.
Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र
या अख्यायिकेनुसार भक्त प्रल्हादला मारण्याच्या अनेक प्रयत्न करणा-या हिरण्यकश्यपचा संहार केल्यानंतर भगवान नरसिंहा अत्यंत क्रोधित होते. तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी अधो सिंह आणि अर्घा पक्षी असा शरभ अवतार भगवान शंकरजींनी घेतला.