फोटो सौजन्य- pinterest
भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होळीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. पंजाबमध्ये होळी खूप वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. शीख समुदायाची होळी साजरी करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. शीखांच्या होळी साजरी करण्याच्या पद्धतीला ‘होला मोहल्ला’ म्हटले जाते. होला मोहल्ला म्हणजे काय आणि किती दिवस आणि कुठे हा सण साजरा केला जातो, ते जाणून घेऊया.
होळीचा सण भारतात खूप उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात होळीशी निगडीत वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. उत्तर प्रदेशमध्ये होळीची वेगळी पद्धत आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये होळीची वेगळी पद्धत आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये होळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. पंजाबमध्येही होळी साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. पंजाबमध्ये होळी फक्त रंगांचा उत्सव नाही तर होळी पंजाबमध्ये शौर्याचे प्रतीक आहे. होळीच्या काळात इथे अनेक खेळ खेळले जातात. शीखांच्या होळी साजरी करण्याच्या पद्धतीला होला मोहल्ला म्हटले जाते. मार्च महिन्यातच होला मोहल्ला साजरा केला जातो.
होला म्हणजे हल्ला, हा सण म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा दिवस आहे. आनंदपूर साहिब इथे तीन दिवस हा होळीचा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात तरुणांच्या वेगवेगळ्या कलांचे प्रदर्शन बघायला मिळते. वेगवेगळे खेळ, शक्ती प्रदर्शन यासोबतच इथे कीर्तन, गाण्यांचीही संगीत मेजवानी असते. लंगर सेवेद्वारे कायम अन्नदान केले जाते.
शीखांचा धार्मिक ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्या होला मोहल्लाचा उल्लेख आहे. या ग्रंथात लिहिले आहे की, होळी साजरी करणे म्हणजे देवाच्या जवळ जाणे आहे. होला मोहल्ला निहंग हा शीखांचा खास सण आहे. याला बंधूभाव आणि एकात्मतेचे प्रतीकही मानले जाते.
शीखांचे दहावे गुरु – गुरु गोविंद सिंह यांनी 1701 मध्ये वसंत ऋतुच्या काळात होला मोहल्ला साजरा करायला सुरुवात केली. गुरु गोविंद सिंह यांनी आपल्या अनुयायांना होळीच्या काळात आनंदपूर साहिब इथे बोलावले होते. तेव्हापासून या प्रथेला सुरुवात झाली. असे सांगितले जाते.
होला मोहल्लाच्या काही दिवस आधीच आनंदपूर साहिबजवळ लोक एकत्र यायला सुरुवात होते. होळीच्या काळात इथे भाविकांसाठी खास शिबिराचे आयोजन केले जाते. लोक धान्य आणि इतर काही सामान घेऊन इथे गोळा होतात. धान्याचा बराचसा भाग ते लंगरसाठी दान करतात.
हा सण तीन दिवस साजरा केला जातो. पण याची तयारी आठ दिवस आधीच सुरू होते. शीखांचे शौर्य दाखवण्यासाठी इथे खोटी लढाई लढली जाते. या काळात तलवारबाजी केली जाते. रॅलीच्या काळात सगळ्यांच्या हातात तलवार असते. खोटे युद्ध संपल्यावर यात सहभागी झालेल्यांवर गुलाब पाणी, अत्तर, केशर पाणी आणि रंग टाकला जातो. निहंग शीखांचे वेगवेगळे ग्रुप इथे येतात. इथे येण्यासाठी ते अनेक वाहनांचा वापर करतात. काही जण दुचाकी घेऊन येतात तर काही जण ट्रॅक्टर घेऊन येतात. काही लोक बैलगाडीही घेऊन येतात.
या तीन दिवसांच्सा उत्सवात शीख युवकांना सैन्याचे शिक्षण दिले जाते. धनुर्विद्या, घोडेस्वारी यांच्या प्रशिक्षणाबरोबरच संगीत आणि काव्य यांच्या स्पर्धांनाही गुरू गोविंदसिंहांनी विशेष स्थान दिले. आजही याचे स्मरण म्हणून शीख सांप्रदायिक तीन दिवसांचा हा उत्सव जत्रा, स्पर्धा, मर्दानी खेळांनी साजरा करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शीख समुदायात होळीला होला मोहल्ला असे म्हटले जाते. हा सण शौर्य, संघटन आणि धार्मिक एकात्मतेचे प्रतीक मानला जातो.
Ans: शीखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांनी 1701 साली या परंपरेची सुरुवात केली, असे मानले जाते. त्यांनी अनुयायांना शौर्य आणि संघटनाचे धडे देण्यासाठी हा उत्सव सुरू केला.
Ans: इतर ठिकाणी होळी रंगांच्या उधळणीसाठी ओळखली जाते; मात्र शीख समुदायात हा सण शौर्यप्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी, मर्दानी खेळ आणि खोट्या युद्धांचे प्रात्यक्षिक हे मुख्य आकर्षण असते.






