स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज निधन झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. न भूतो न भविष्यती असे राज्य निर्माण करणारे राजे जनतेला पोरके करुन स्वर्गाच्या वाटेवर निघाले. त्यांचे सोडून जाणे हे केवळ रायगडासाठी नाही तर संपूर्ण हिंदूराष्ट्रासाठी पोकळी निर्माण करणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आजीवन रयतेची सेवा आणि रक्षण यासाठी आयुष्य खर्ची केले. ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि स्वराज्याचा आधारस्तंभ हरपला. एक महान राजा, कुशल योद्धा आणि जनतेचा रक्षक हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. (Dinvishesh)
03 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
03 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
03 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






