• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day 2025 One Indian State Gained Freedom 14 Years After 1947 Find Out Which

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा

Independence Day 2025: भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण एक राज्य असे आहे ज्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी 14 वर्षे लागली, चला जाणून घेऊया ते राज्य कोणते आहे?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 14, 2025 | 01:28 PM
Independence Day 2025 One Indian state gained freedom 14 years after 1947 find out which

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील १४ वर्षे गुलाम राहिले 'हे' राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Independence Day 2025: भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या दीर्घ २०० वर्षांच्या राजवटीतून मुक्त झाला. या दिवशी देशभर जल्लोष झाला, तिरंगे फडकले आणि नव्या भारताचा पहाटेचा सूर्य उगवला. मात्र, स्वतंत्र भारताच्या नकाशावर एक कोपरा असा होता, जिथे अजूनही परकीयांचा झेंडा फडकत होता. हे होते गोवा, दमण आणि दीव जे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या स्वातंत्र्यासाठी गोव्यातील जनतेला आणि भारताला तब्बल १४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

गोव्याचा पोर्तुगीजांच्या ताब्याखालील इतिहास

गोव्याचा इतिहास १५१० साली बदलला, जेव्हा पोर्तुगीजांनी हा सुंदर किनारपट्टीचा प्रदेश जिंकून घेतला. पुढील जवळपास ४५० वर्षे त्यांनी गोवा, दमण आणि दीववर राज्य केले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्लीमध्ये तिरंगा फडकत होता, पण गोव्यात मात्र पोर्तुगीज ध्वजच फडकत होता. भारत सरकारने गोवा भारतात विलीन करण्याची मागणी केली, मात्र त्या वेळीचे पोर्तुगीज हुकूमशहा अँटोनियो सालाझार यांनी ती मागणी धुडकावून लावली.

आंदोलन आणि प्रतीक्षेची १४ वर्षे

१९४७ ते १९६१ या काळात गोव्यात स्वातंत्र्याच्या चळवळी उसळल्या. हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीज सत्तेविरोधात आवाज उठवला, मोर्चे काढले, तुरुंगवास भोगला. भारत सरकारने शांततेत तोडगा काढण्याचे प्रयत्न केले, पण पोर्तुगीज हट्टावर ठाम राहिले. अखेर १४ वर्षांच्या संघर्षानंतर निर्णायक पाऊल उचलण्यात आले.

हे देखील वाचा : US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन? भारताची सावध भूमिका

‘ऑपरेशन विजय’  गोव्याच्या मुक्तीचा दिवस

१८ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली, ज्याला ‘ऑपरेशन विजय’ असे नाव देण्यात आले. अवघ्या ३६ तासांत पोर्तुगीज सैन्याचा पराभव झाला. १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल अँटोनियो वासालो ई सिल्वा यांनी आत्मसमर्पण केले. अशा प्रकारे १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोवा अखेर भारताच्या कुशीत आला.

गोवा मुक्ती दिनाचा उत्सव

आजही १९ डिसेंबर रोजी गोव्यात गोवा मुक्ती दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि गोव्यातील जनतेच्या त्यागाचा प्रतीक आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यामुळे भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व अधिक मजबूत झाले.

स्वातंत्र्यदिनाचे खरे महत्त्व

स्वातंत्र्यदिन हा केवळ भूतकाळातील विजयाचा दिवस नाही, तर आपल्या एकतेचा, राष्ट्रीय अभिमानाचा आणि कर्तव्यभावनेचा दिवस आहे. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान तिरंगा फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात. देशभर शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांत देशभक्तीपर गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आयोजित केल्या जातात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Karachi Aerial Firing : पाकिस्तानमध्ये हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक जखमी

गोव्याची कथा आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य केवळ जिंकावे लागत नाही, तर ते टिकवून ठेवण्यासाठीही सतत सज्ज राहावे लागते. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही १४ वर्षे परकीयांच्या ताब्यात राहिलेल्या या भूमीने शेवटी भारतमातेच्या कुशीत स्थान मिळवले आणि आज ती भारतीय ओळखीचा अभिमानास्पद भाग आहे.

Web Title: Independence day 2025 one indian state gained freedom 14 years after 1947 find out which

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • Goa
  • Independence Day
  • Independence Day Special
  • special news

संबंधित बातम्या

गोव्यात आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेस आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा
1

गोव्यात आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेस आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी
2

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी

सप्टेंबर महिन्यात गोव्याजवळील ‘या’ मन मोहक समुद्रकिनाऱ्यांना नक्की द्या भेट, अद्भुत नजारा पाहून मन होईल खुश
3

सप्टेंबर महिन्यात गोव्याजवळील ‘या’ मन मोहक समुद्रकिनाऱ्यांना नक्की द्या भेट, अद्भुत नजारा पाहून मन होईल खुश

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
4

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI 1st Test : ‘यॉर्कर किंग’ धुमाकूळ! बूमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर कॅरिबियन फलंदाजांची दाणादाण; पहा Video

IND vs WI 1st Test : ‘यॉर्कर किंग’ धुमाकूळ! बूमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर कॅरिबियन फलंदाजांची दाणादाण; पहा Video

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात मिनिमम बॅलन्सची कटकट संपली; ‘या’ ८ बँकांमध्ये आता शून्य बॅन्सवरही काम होणार

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात मिनिमम बॅलन्सची कटकट संपली; ‘या’ ८ बँकांमध्ये आता शून्य बॅन्सवरही काम होणार

Farmer Suicide:  १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर

Farmer Suicide: १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर

ब्रिटन हादरला! मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळाबाहेर लोकांवर हल्ला ; कारने धडक दिल्यानंतर चाकूने वार

ब्रिटन हादरला! मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळाबाहेर लोकांवर हल्ला ; कारने धडक दिल्यानंतर चाकूने वार

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Karjat News : पाली भूतिवली धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक; बोटिंग सुविधेला गावकऱ्यांनी दर्शवले काळे झेंडे

Karjat News : पाली भूतिवली धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक; बोटिंग सुविधेला गावकऱ्यांनी दर्शवले काळे झेंडे

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.