• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Marathi Article For Marathi Drama Marathi Cinema Occasion On Marathi Bhasha Din

मराठी भाषा गौरव दिन: एक सूर एक ध्यास छेडितो मराठी, एक संघ एक बंध गुंजीतो मराठी

मायमराठी फक्त व्यावहारीकच नाही तर ग्रामिण भागातील लहेजाने नटलेली आहे.खरंतर प्रमाण भाषा म्हणजे पुर्णत: मराठी भाषा नव्हे हे साहित्य विश्वातील मातब्बर मंडळींनी दाखवून दिलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 25, 2025 | 02:54 PM
मराठी भाषा दिन: एक सूर एक ध्यास छेडितो मराठी, एक संघ एक बंध गुंजीतो मराठी

फोटो सौजन्य: विकीपीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी”

कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या या ओळी गाताना आणि ऐकताना अभिमानाने उर भरुन येतो. हे सांगण्यात कारण म्हणजे मराठी भाषा दिनाचं औचित्य. दिग्गज लेखक आणि कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन . प्रत्येक मराठी शाळेत कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जायचा. आता ही काही प्रमाणात साजरा केला जातो जरी पद्धत बदलली असली तरी. आपल्या देशाची संस्कृतीच ही आहे आईला देवाचा दर्जा दिला जातो. म्हणूनच या माय मराठी मातृभाषेवर असलेलं उदात्त प्रेम, आपुलकी आणि स्नेह हा कवी कुसुमाग्रजांच्या लेखनातून कायमच दिसून आला. साहित्य विश्वात मराठी भाषेच्या बाबतील कुसुमाग्रजांनी मोलाचं कार्य केलं होतं. त्यांनी केलेल्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणं या उद्देशाने कुसुमाग्राजांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात.

अभिजात भाषा

कुसुमाग्रजांच्या पावलांवर पाऊल ठेवत कला, साहित्य या क्षेत्रात मराठी भाषेसाठी काम करणारे अनेक थोर मंडळी झाले आणि आहेत देखील. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी देखील अनेक राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि कलाकारांचा देखील मोठा वाटा आहे. अशी ही मायमराठी फक्त व्यावहारीकच नाही तर ग्रामीण भागातील लहेजाने नटलेली आहे. ती कोकणातल्या नारळासारखी मधाळ, पश्चिम महाराष्ट्राच्या लवंगी मिरचीचा ठसका असलेली रांगडी, विदर्भातील आपुलकी, मराठवाड्यातील खमकेपणा या सगळ्यांना अंश असलेली भाषा म्हणजे मराठमोळी मराठी आहे. मध्यंतरीच्या काळात गावकडच्या भाषेला हीन दर्जाची वागणुूक मिळत असे. मात्र यावर वेळोवेळी आवाज उठवल्यानंतर ही हीनपणाची वागणूक देणं कमी झालं.खरंतर प्रमाण भाषा म्हणजे पुर्णत: मराठी भाषा नव्हे हे साहित्य विश्वातील मातब्बर मंडळींनी दाखवून दिलं. कवयित्री शांता शेळके, ना. धो. महानोर. आण्णा भाऊ साठ्ये, नामदेव ढसाळ .यांच्या सारख्या लेखकांनी गावतल्या भाषेला जीवंतपणा दिला. हीच परंपरा पुढे नेणारे, संजय कृष्णाजी पाटील, किशोर कदम, नागराज मंजुळे हे कलाकार मंडळींनी रांगड्या माय मातीचं असणं चित्रपट , नाटक आणि कथा कांदबऱ्य़ामधून जपत आहेत.

मराठीचा अटकेपार झेंडा

एकीएकडे मराठी भाषा मराठी नाटकं हे लयाला गेली अशी बोंब होत असताना नागराज मंजुळेंसारखा मातीतला कलाकार हा फॅंड्री, पिस्तुल्या, नाळ, पावसाचा निबंध आणि सैराटसारख्या ग्रामीण जीवनावर भाषेवर सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकतो आणि थेट हा महाराष्ट्राच्या मातीतला सिनेमा ऑस्कर पर्यंत जातो. दिग्दर्शक रवी जाधवांनी नटरंग साकारला तेव्हा गुणा कागलकर या तमाशा कलावंताच्या आयुष्याची कहाणी सर्वसामन्यांनी उचलून धरली. मराठी नाटकांचा जमाना आता राहिला नाही असं म्हणणाऱ्यांसमोर लेखक प्राजक्त देखमुख यांनी संगीत देवबाभळी सारखा अविष्कार सादर केला. पंढरीचे माय बाप विठु रखुमाई आणि अभंगातून भक्ती, करुणा, अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणारे तुकोबा आणि घराची सावली आणि संसारासाठी समर्पण करणारी आवली यांच्या आयुष्याची अभंगाथा सांगणारं देवबाभळी नाटकाचे प्रयोग फक्त भारतच नव्हे अमेरिका, कॅनडा या ठिकाणी देखील करण्यात आले. मग्न तळ्याकाठी, वाडा चिरेबंदी, आरण्यक या अलीकडच्या काळातील मराठी नाटकांनी देशातच नव्हे तर परदेशातही मराठीचा डंका वाजवला आहे. मराठी भाषा म्हणजे संतांची अमृतवाणी, छत्रपती शिवरायांच्य़ा हातातील तलवार, अन्यायाविरोधात आवाज उठण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकारांच्या हातातील धारदार लेखणी, अशी ही मायमराठी भाषा विविधतेने नटलेली असूनही एकता आणि समता जपणारी आहे.

 

 

Web Title: Marathi article for marathi drama marathi cinema occasion on marathi bhasha din

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • kavivarya kusumagraj jayanti
  • Marathi Bhasha Gaurav Din
  • marathi cinema
  • Marathi Theatre

संबंधित बातम्या

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…
1

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
2

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! दर्जेदार टेक्निकल टीमसह भव्य चित्रपट
3

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! दर्जेदार टेक्निकल टीमसह भव्य चित्रपट

‘मनाचे श्लोक’मधून “लीना भागवत-मंगेश कदम” मोठ्या पडद्यावर आमनेसामने
4

‘मनाचे श्लोक’मधून “लीना भागवत-मंगेश कदम” मोठ्या पडद्यावर आमनेसामने

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व

Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व

Navratri 2025 :  गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

Navratri 2025 : गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.